HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरेंची पुन्हा स्वबळावर लढण्याची घोषणा

महाड | रायगड लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आज महाड येथे मेळावा झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी पुन्हा शिवसेना स्वतंत्र आणि स्वतःच्या हिंमतीवर लढणार असल्याचे म्हटले आहे. “मावळे समोर आहेत लढण्याची सुरुवात झाली आहे. देशाचं राजकारण आणि वातावरण चांगले नाही. या विटा तुमच्या सिंहासनापर्यंत पोहोचण्यासाठीच्या पायऱ्या आहेत त्या राम मंदिरासाठी नव्हत्या,” असा तीव्र आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

पुढच्या वर्षी २०१९ मध्ये निवडणूक येत आहेत पण आम्हाला लोकांचे काय होणार, देशाचे काय होणार याची चिंता असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. लोक शिवसेनाप्रमुखांशी राजकारण खेळताना मी स्वतः जवळून पाहिले आहे. हा पक्ष पुढे कसा न्यायचा हे शिवसेनाप्रमुखांनी मला शिकवले आहे. एकदा भाजपाने सांगावे की, राम मंदिर जुमला होता, मग २८० वरून २ पर्यंत आल्याशिवाय तुम्ही राहणार नाही, असेही ठाकरे म्हणाले आहेत.

सर्वसामान्य लोकांना विचारा कि, मोदींच्या योजनेचा तुम्हला काय फायदा झाला ? आम्हाला लोकांंना फसविणारी लोक नकोत. शिवसैनिकांचे प्रेम ही माझ्यासाठी खूप मोठा दागिना आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पाहीजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#KnowYourNeta | जाणून घ्या…नागपूर मतदारसंघाबाबत !

News Desk

… तर पद्मभूषण पुरस्कार परत करणार, अण्णा हजारेंचा इशारा

News Desk

अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार

News Desk
महाराष्ट्र

न्यायमूर्ती लोयाची चौकशी का थांबवतायत | पृथ्वीराज चव्हाण

News Desk

सोहराबूद्दीन इनकाऊन्टर प्रकरणात न्यायधीश म्हणून काम करणाऱ्या न्यायधीश लोया यांच्या हत्येचा प्रकरणाची चौकशी होऊ नये यासाठी राज्य सरकार हरीष सावळे सारखे महागडे वकील लावत आहेत.

चौकशी होऊ न देण्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि सरकारचा काय इंटरेस्ट आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. न्यायमुर्ती लोया यांच्या मृत्यूची चौकशी तसेच सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर काय भूमिका आहे याची माहिती सभागृहाला द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

राज्यातील कायदा व्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून लोकांचा कायद्यावर विश्वार राहिला आहे की नाही असे वातावरण तयार झाले असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर केला.

Related posts

बोगस मतदानाची शक्यता ?

News Desk

शिवसेना आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

News Desk

…तर अजित पवार म्हणाले, आणि रोहित पवारांनी देखील केंद्राकडून केली मदतीची अपेक्षा!

News Desk