HW News Marathi
राजकारण

एकनाथ खडसे यांचा भाजपला घरचा आहेर

नंदुरबार | सातपुडा कारखान्यातील ४४व्या गळीत हंगामाचा शुभारंभ (आज) बुधवारी करण्यात आला. हा कार्यक्रम आमदार एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षापासून मंत्रीपदापासून दूर राहिलेल्या आमदार एकनाथ खडसे यांनी दुःख व्यक्त केले. एकनाथ खडसे यांनी ४४व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात वक्तव्य केले आहे. ‘अमरीशभाई, अच्छे दिन हमारे भी आयेंगे..’ असे यावेळी एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

पुढे एकनाथ खडसे म्हणाले, “मला राजकारणात आणि समाजात येऊन ४० वर्ष झाली. या ४० वर्षांत मी एकही निवडणूक हरलो नाही, एकही गुन्हा माझ्या नावावर दाखल झालेला नाही. भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले नाहीत. भाजप सत्तेवर यावी म्हणून रक्ताचे पाणी केले, कष्ट केले पण सत्ता मिळताच मला मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले. माझे काय चुकले ?” एकनाथ खडसे आपल्या डोक्यावरची टोपी फिरवत म्हणाले कि, डोक्यावरची टोपी मी फिरवतो परंतु राजकारणात कधी टोपी फिरवणार नाही. “अच्छे दिन हमारे भी आयेंगे” असे म्हणत त्यांनी आपल्या मनातील भावना मोकळ्या केल्या आहेत. त्यानंतर या कार्यक्रमात आमदार अमरिशभाई पटेल यांनीही मनोगत व्यक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“बेकायदेशीर शिंदे सरकारचे बेकायदेशीर प्रवक्त्याचे पवारांवरील वक्तव्य बेजबाबदारपणाचे”

Manasi Devkar

देशातील पहिले २ रुग्ण ‘कोरोना’मुक्त झाल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आनंद

News Desk

सरकारविरोधात बोलल्यामुळे पद्मश्री राहीबाई पोपेरेंचा भर कार्यक्रमात माईक केला बंद

Aprna
क्राइम

दाऊदच्या खंडणी टोळीत राजकारण्यांची नावं

News Desk

ठाणे अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरसोबत त्याच्या बहिणीचा दीर इकबाल पारकर, मोहम्मद हुसैन ख्वाजा शेख (ड्रग डीलर), फर्नांडो असे आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे.अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली.

इक्बाल कासकर त्याच्या बहिणीच्या घरी कौन बनगे करोडपती बघत बिर्याणी खात असताना अटक करण्यात आली आहे. इक्बाल कासकर खंडणी रॅकेट चालवत होता. दाऊदच्या खंडणी टोळीत थेट राजकारण्यांची नावं असल्याची शंका परमवीर सिंह यांनी व्यक्त केल्याने, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Related posts

आरोपीची तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या

News Desk

अनिल देशमुखांच्या जावयाला अटक!

News Desk

छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी पेटवली प्रवासी बस

News Desk