HW News Marathi
राजकारण

भारताची राजधानी वायू प्रदूषणाच्या विळख्यात

नवी दिल्ली | भारतात वायू प्रदूषणामुळे २०१६ मध्ये तब्बल १ लाख २५ हजार लहान मुले दगावली आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालातून समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या अहवालात जगातील एकूण पाच देशांची नावे आहेत. या पाच देशांमध्ये भारताचे देखील नाव आहे. भारतात प्रदुषणाचे प्रमाण अधिक आहे. मुख्यतः राजधानी दिल्लीत प्रदूषणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारतात विशेषतः स्वयंपाकघरात आणि घराबाहेर निर्माण होणारे वायूचा गंभीर परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर दिसून येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या या अहवालानुसार, दारिद्र्यरेषेखालील अणि मध्यमवर्गीय देशांमध्ये ५ वर्षांपेक्षा देखील कमी वय असलेल्या तब्बल ९८ टक्के मुलांना वायू प्रदूषणातून निर्माण झालेल्या हवेतील सूक्ष्म कणांमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील वायू प्रदूषण, बाल आरोग्य आणि स्वच्छ हवा या मुद्द्यांच्या संदर्भांत एक अहवाल सादर केला होता.

जागतिक वायू प्रदूषणाबाबत ग्रीनपीसनेही एक अहवाल सादर केला आहे. ग्रीनपीस यांनी जारी केलेल्या अहवालात भारताच्या प्रदूषण पातळीचे खूपच भयानक असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने जागतिक आरोग्य संघटनेचा हा वायू प्रदूषणाबाबतचा अहवाल सादर झाल्यानंतर दिल्ली आणि देशातील इतर राजधानी क्षेत्रांत प्रदूषणांची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे म्हणत तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईतला मराठी माणूस ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये विसावला !

News Desk

…तर आज राज ठाकरे यांच्यावर ही वेळ आली नसती !

News Desk

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादी, गांधी कुटुंबासोबत राधाकृष्ण विखे-पाटील यांचा समावेश

News Desk
देश / विदेश

पंतप्रधान केरळमध्ये दाखल, केरळच्या पूरस्थितीची हवाई पाहणी करणार

News Desk

तिरुवनंतपुरम | केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुराने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळत असलेला पाऊस आणि पुरामुळे सध्या मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. आतापर्यंत या पुरामुळे ३२४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ८ ऑगस्टपासून केरळमध्ये सुरु असलेल्या पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री केरळमध्ये दाखल झाले.

आज पंतप्रधान केरळच्या पूरस्थितीची हवाई पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवरुन बोलणे झाल्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये मोदींनी म्हटले आहे की, केरळमधील स्थितीवर केंद्र सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे.

 

Related posts

राधे माँ यांचे जुन्या आखाड्यात पुनरागमन !

News Desk

‘जनता कर्फ्यू’ असूनही शाहिनबागमधील आंदोलन सुरुच राहणार

swarit

अयोध्या प्रकरणाच्या अंतिम निर्णयावर जमियत उलेमा ए हिंदकडून पुनर्विचार याचिका

News Desk