HW News Marathi
देश / विदेश

सलग नवव्या दिवशी पेट्रोल २५ पैशांनी स्वस्त

मुंबई | आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्या तेलाच्या दारात केल्या काही दिवसंपासून घट झाल्याने आज (२६ ऑक्टोबर) सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे. पेट्रोल २५ तर डीझेल ७ पैशानी स्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काच्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने इंधनाच्या किंमतीत घट झाली आहे. मुंबईत आजची किंमत ८६.३३ लिटर तर डिझेल ७.३३ रुपये इतकी आहे. गेल्या ९ दिवसात पेट्रोलचा दर १.९६ रुपये कमी झाला आहे.

दिल्लीत पेट्रोलचा भाव ८१.१० वरून कमी होत ८०.८५ रुपये झाला आहे. आणि डिझेलचा भाव ७४.८० रुपयांवर ७४.७३ मुंबईसह राज्यात, जिल्ह्यात आणि प्रमुख शहरामध्ये देखील काही पैश्याने स्वस्त झाले आहे. केंद्र सरकार आणि पेट्रोलियम कंपन्यानकडून इंधन दरात अडीच रुपये कमी करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने पेट्रोलमध्ये अडीच रुपये कमी करत दिलासा होता, मात्र यांनातर पुन्हा सातत्याने पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतच राहते. गेल्या ९ दिवसापासून मात्र रोज या दरात घाट होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वाराणसीतील मॉलमध्ये गोळीबार

Gauri Tilekar

परदेशात जॉब करण्याआधी खात्री करा, महाराष्ट्रमधील युवकाची फसवणूक करून बेदम मारहाण

Manasi Devkar

पाकिस्तानचे हेलिकॉप्टर भारताच्या हद्दीत

swarit
देश / विदेश

काश्मीरमध्ये २४ तासात ८ दहशतवाद्यांना कंठस्नान तर एक जवान शहीद

News Desk

श्रीनगर । उत्तर काश्मीरच्या सोपोरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्या झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून एक जवान शहीद झाला आहे. लष्कर आणि दहशतवादी यांच्यात सध्या चकमक सुरू आहे. भारतीय लष्कराकडून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात राबवण्यात येत असलेल्या मोहिमे अंतर्गत आज (२५ ऑक्टोबर)ला ६ दहशतवाद्यांना खात्मा करण्यात मोठे यश आले आहे.

सहा दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरमधील बारामुला आणि अनंतनाग येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बारामुला येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. तर अनंतनाग येथे चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

भारतीय लष्कराकडून बारामुला जिल्ह्यात शोधमोहीम सुरू होती. त्यादरम्यान, दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. अनंतनाग जिल्ह्यात आज झालेल्या अन्य एका चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्यांबाबत माहिती गोळा करण्यात येत आहे. त्याआधी बुधवारी नौगाम येथील सुथू येथे झालेल्या चकमकीत दोन दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.

Related posts

नाशिकचा जवान केशव गोसावी यांना काश्मीरमध्ये वीरमरण

News Desk

‘अडीच लाख’ ग्रामपंचायती वायफायने जोडणार | मनोज सिन्हा

News Desk

पेट्रोल-डिझेल किंमतीत सलग सहाव्या दिवशी घट

swarit