HW News Marathi
राजकारण

खिशात फाटलेले राजीनामे एकदा तरी द्या !

सासवड ।”शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना वडिलांचे स्मारक बांधता आले नाही, ते निघाले राम मंदीर बांधायला,दुष्काळ पडलाये त्याच्यावर बोलायला वेळ नाही, आणि मंदीरे कुठली बांधता? जनसेवेतच ईश्वरसेवा आहे. शिसेना नेहमी सत्तेतून बाहेर परडण्याच्या गप्प मारते, परंतु अद्याप तरी सत्तेतून बाहेर पडलेली नाही. राजीनामे खिशात आहेत असे नेहमीच म्हणते, खिशात फाटलेले राजीनामे एकदा तरी द्या, बघुयात निवडणुकीत कोण कोणाबरोबर जाते ते दिसेलच”,अशी खोचक टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल(२४ ऑक्टोबर) सासवड केली आहे.

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील नगरपालिका चौकातून तहसिल कार्यालयापर्यंत काल(२४ ऑक्टोबर) दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मोर्चाचे नेतृत्व करत असताना सुप्रिया बोलत होत्या. देशाबाहेरील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख येणार होते. शेतीमाल बाजारभाव पाडून शेतकऱ्यांचेच १५ लाख घालविले,अशी टीका केंद्र व राज्य सरकारवर सुप्रिया यांनी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसने शेतकऱ्यांना बरबाद केले, पंतप्रधान मोदींची जहरी टीका

News Desk

सरकारला शेतकऱ्यांचे सोयरसुतकच नाही

News Desk

वर्षभरापूर्वी काश्मीरमध्ये सरकार चालवत होतात ते कोणत्या देशात ?

News Desk