HW News Marathi
राजकारण

‘२०२२ पर्यंत रस्ते विकासाचे चित्र पूर्णपणे बदलणार’

कल्याण | येत्या दहा वर्षात राज्यभरातील सर्व रस्त्याला एकही खड्डे नसणार, असे वक्तव्य सार्वजनिक कामगार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच २०२२ पर्यंत रस्ते विकासाचे चित्र पूर्णपणे बदलेल, असा दावा पाटील यांनी व्यक्त केला आहे. गावात मंत्री येणार ही माहिती मिळताच सर्व सरकारी कर्मचारी कामाला लागतात. रस्ते सुधारण्याची किंवा रस्ते बनवण्याची सूचना नसेल तरी रस्ते बनविले जातात असे धक्कादायक वक्तव्य सार्वजनिक कामगार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

तसेच कल्याण-पडघा रोडवरील बापसाई गावात सुरेश हावरे यांनी उभारलेल्या गृह प्रकल्पातील सदनिकाधारकांना पाटील यांच्या हस्ते चाव्या वाटप करण्यात आले. रस्ते विकसित केल्यावर तीन ते पाच वर्षात रस्ता खराब झाला अथवा रस्त्यावर खड्डे पडल्यास संबंधीत कंपयांकडून रस्ता दुरुस्ती देखभालीचे दायित्व दिले जाणार आहे व खड्डे बुजविण्याची जबाबदारी निश्चित केले जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तब्बल ४ वर्षांनंतरही परळी-धायगुडा राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था कायम

News Desk

छत्रपती शिवाजी महाराज काय तुमची एकट्याची जहागीर आहे का ?

News Desk

राज ठाकरेंची घेतलेली भेट ही सदिच्छा भेट होती! – मुख्यमंत्री

Aprna
राजकारण

भाजप सरकारने महाराष्ट्र अधोगतीकडे नेला- अशोक चव्हाण

News Desk

मुंबई : महाराष्ट्र दिना निमित्त पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारने महाराष्ट्र अधोगतीकडे नेला अशी टिका केली. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, आज महाराष्ट्र दिन आहे परंतु गेल्या चार वर्षात महाराष्ट्राचा गौरव व्हावा असे कोणतेही धोरण भाजप शिवसेनेच्या सरकारने राबवले नाही. या सरकारच्या काळात कष्टकरी, श्रमजीवी, शेतकरी वर्गाला न्याय मिळताना दिसत नाही. उलट या सरकारमुळे राज्याची प्रगती न होता अधोगती होत आहे. महाराष्ट्र राज्याला या सरकारच्या विळख्यातून सोडविण्याची गरज असल्याचेही चव्हाण यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणालेत.

महाराष्ट्र ख-या अर्थाने प्रगतीच्या मार्गावर गेला पाहीजे. शेतक-यांना ख-या अर्थाने न्याय मिळाला पाहीजे. महाराष्ट्रात रोजगार निर्मिती व्हावी. तरुणांना नोक-या मिळाव्यात असे असंख्य प्रश्न महाराष्ट्रापुढे आज उभे आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी विद्यमान सरकार अपयशी ठरले त्यामुळे हे सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे नेत आहे असे म्हणत चव्हाण यांनी विद्यमान सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले.

 

Related posts

राहुल गांधींनी जवानांचा अपमान केला | अमित शहा

News Desk

‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे आणि गौतम अदानी यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

शत्रुघ्न सिन्हांची पत्नी पूनम सिन्हांचा सपामध्ये प्रवेश, लखनौमधून उमेदवारी

swarit