HW News Marathi
राजकारण

हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न केला जात आहे !

जेजुरी। “हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न केला जात” असल्याचा आरोप भारिपचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी जेजुरीत केला आहे. पुढे ते असे देखील म्हणाले की, “वंचित समाजाने वेळीच सावध होऊन एकत्र येण्याचे आवाहन” देखील त्यांनी उपस्थितांना केले. वंचित समाजावर वर्चस्व टिकवण्यासाठीच विचारवंतांच्या हत्या केल्या जात आहे असा आरोप करून सरकारव आंबेडकर यांनी हल्लाबोल केला आहे.

जेजुरीमध्ये समस्त धनगर समाज व बहुजन समाजाच्या वतीने दसरा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला भारिपचे राष्ट्रीय नेते डॉ. प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि खासदार राजू शेट्टी एकाच व्यासपीठावर आले होते. “सत्तेत येण्यापूर्वी तत्कालीन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीसांनी बारामतीच्या मेळाव्यात म्हणाले होते की, सत्तेत आल्यास धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना त्यांच्याच आश्वासनाचा विसर पडला आहे. आरक्षणाचे घोंगडे फडणवीस सरकारने भिजत ठेवले आहे. राज्यातील संविधानप्रेमींनी एकाच व्यासपीठावर यायला हवे तरच परिवर्तन होईल”,असे खासदार राजू शेट्टी यावेळी बोले आहे.

दरम्यान,डॉ. प्रकाश आंबेडकर म्हणाले की,”मनुवादी विचारसरणींचे लोक बहुजनांचा विचार करूच शकत नाही. बहुजनांवर वर्चस्व टिकवण्यासाठीच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यासारख्या विचारवंतांच्या हत्या केल्या जात आहेत. जातीजातींमध्ये भांडणे लावली जात आहेत. याचबरोबर राज्यातील बहुजनवर्ग दुष्काळात होरपळतोय पण सरकराला मात्र दुष्काळ जाहीर करायचा नाही”.असे टीकास्त्र आंबेडकरांनी सरकारवर केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कामोठेमध्ये पैसे वाटप करणाऱ्या शेकापच्या कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले

News Desk

सर्वोच्च न्यायालयाचा राजीव कुमार यांना धक्का, हटविली अटकेवरील स्थगिती

News Desk

अखेर प्रियांका चतुर्वेदी काँग्रेसमधून बाहेर पडल्या

News Desk
राजकारण

शिवसेना-मनसेत पुन्हा पोस्टर वॉर

swarit

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये सध्या पोस्टर वॉर चागंलीच रंगल्याच चित्र सध्या महाराष्ट्रातील जनतेला दिसत आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदीरा बांधण्यासाठी अयोध्येला जाणार ही सेनेची भूमिका स्पष्ट केली. यानंतर मनसेने महाराष्ट्राच्या समस्येवर आधारित काही प्रश्न सेनेला विचारेले असे पोटस्टर लावून टीका केली होती. तसेच सेनेने “राहत्या वॉर्डात निवडून यायचे वांदे आणि जगाला सल्ले देण्याचे यांचे धंदे,” असे पोस्टर लावून मनसेला चोख प्रत्युत्तर दिले.

ही पोस्टरवॉर थांबली असे सर्वांना वाटले होते. परंतु ते नसून पुन्हा एकदा पोस्टर वॉरला सुरुवात झाली आहे. मनसेनने पोस्टरवर महाराष्ट्रातले मूलभूत गरज असलेले प्रश्न विचारून शिवसेनवर टीका केली. आता पुन्हा मनसेने पोस्टबाजी करून शिवसेनेला डिवचले आहे.”निवडून येण्याचे वांदे असल्यामुळे शिवसेना दिल्लीश्वरांसमोर लाचारी पत्करत असून धार्मिक व भावनिक विषयांवर राजकारण केले जात”असल्याचे मनसेने आपल्या पोस्टरमध्ये म्हटले आहे.

मनसे आणि सेनेतील पोस्टर वॉर

मनसेने विचारलेले प्रश्न

महाराष्ट्राचे रस्ते खड्डे मुक्त होणार का? महागाई कमी होणार का? महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहणार का? बेरोजगारांना रोजगार मिळणार का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का? शेती मालाला हमी भाव मिळणार का? महाराष्ट्रातला दुष्काळ संपणार कामोकळ्या जागांवरील अतिक्रमण थांबणार का?महापालिकेतील भ्रष्टाचार संपणार का? खिशातले राजीनामे बाहेर पडणार का?

 

शिवसेनेने दिलेले उत्तर

मनसे विरोधात केलेल्या पोस्टरबाजीत टोल आंदोलनाला सेटिंगवाले टोल आंदोलन असा शब्द वापरण्यात आला आहे. “राहत्या वॉर्डात निवडून यायचे वांदे आणि जगाला सल्ले देण्याचे यांचे धंदे,” असे म्हणत राज ठाकरेंवरच जोरदार टीका केली आहे. पाक कलाकरांच्या विरोधाच्या नावे खुलेआम सेटिंग करण्यात आल्याचेही या पोस्टरमध्ये लिहिण्यात आले आहे.असे प्रतिउत्तर शिवसेनेने दिले होते. मनसेने शिवसेना भवनासमोर, शिवसेनेला अयोध्या वारीला शुभेच्छा देणारे खोचक पोस्टर लावले. या पोस्टरवर महाराष्ट्रातले मूलभूत गरज असलेले प्रश्न विचारत सेनेवर टीका केली गेली होती. त्यांनतर शिवसेनेने त्यांना त्या पोस्टरला प्रति उत्तर दिले.

Related posts

राफेलवरून संसदेत गदारोळ, राहुल गांधींचा मोदी सरकारवर प्रश्नांचा भडीमार

News Desk

मनोहर पर्रिकरच राहाणार गोव्याचे मुख्यमंत्री

News Desk

तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार ‘म्यानबंद’ नाही !

News Desk