HW News Marathi
राजकारण

#मीटू मोहिमेला रामदास आठवलेंचा पाठिंबा

मुंबई । #मीटू या मोहिमेतून ज्या व्यक्तींवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले आहेत. मग ते नेता असो किंवा अभिनेता मग तो आरोपी असून त्यांच्यावर कादेशीर कारवाई झालीच पाहिजे असे मत केंद्रीय सामाजिकी न्यायमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर ते असे देखील म्हटले की, #मीटू या मोहिमे द्वारे कोणावर ही निराधार आरोप लावण्याचे व्यासपीठ बनवू नये.या मोहिमे अंतर्गत कुणाचीही फसवणूक होय नये.

जर एखाद्या व्यक्ती महिलेला अपमानास्पद वागनू देत असेल तर देखील त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका आठवले यांनी मांडली आहे. आठवले यांनी पुढे असे म्हणाले की, #मीटू या मोहिमे द्वारे मोठ्या व्यक्तींना फसवण्याचं प्रयत्न केला जाऊन शकतो. त्यामुळे पोलिसांनी आरोपांची पडताळी केली पाहिजे.

मीटूचे वादळ आता देशभरात पसरले आहे. मीटू या मोहिमेत अनेक बॉलीवुडमध्ये ज्येष्ठ आणि प्रसिद्ध व्यक्तींवर आरोप लावण्यात आले आहे. यात तनुश्री दत्त्ता, कंगना राणावत, ज्वाला भट्टा, पूजा भट यांच्यासारख्या अनेक महिलांनी मीटू मोहिमेद्वारे आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचाराला वाचा फोडली. केंद्रीय परराष्ट्र मंत्री एम.जे अकबर यांच्यावर #मीटू मोहिमेद्वारे आरोप लावण्यात आले आहेत. काल एम.जे अकबर यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सत्तेत आल्यानंतर एका वर्षात देशातील २२ लाख युवकांना सरकारी नोकऱ्या देणार | काँग्रेस

News Desk

बेस्टच्या संपावर उद्या उच्चस्तरीय समितीची बैठक

News Desk

शिवसेना – भाजप युती तुटणार ही केवळ अफवा ?

News Desk
महाराष्ट्र

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात तोडफोड

News Desk

पालघर | तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात भरती प्रक्रियेत डावल्यामुळे स्थानिकांनी प्रकल्पाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची तोडफोड केली. या प्रकल्पात भूमीपुत्रांना नोकरी देण्याचे आश्वासन देऊनही त्यांना भरतीपासून दूर ठेवल्याचा आरोप स्थानिकांनी करुन वाहनांची तोडफोड केली आहे.

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात सध्या भरती प्रकिया सुरू झाली आहे. या स्थानिक तरुणांनी नोकरीसाठी कॉल केले होते. परंतु भरतीसाठी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना डावलून बाहेरील लोकांना या भरती प्रक्रियेत प्राधांन्य देत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.

यासाठी स्थानिक रस्त्यावर उतरुन, प्रकल्पासाठी जाणाऱ्या वाहनांना अडवीत आहेत. या व्यतिरीक्त बसच्या काचाही फोडल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Related posts

तर निर्भयासारखी प्रकरणे घडतील…

swarit

‘अमरावतीत बोट उलटून एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू!’

News Desk

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ, धमकीचे फोन आल्यामुळे वाढवली सुरक्षा

News Desk