HW News Marathi
महाराष्ट्र

राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई | देशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी देशातील सर्वच विरोधी पक्षांच्या राजकीय हालचालींना अत्यंत जलद गतीने सुरु आहेत. याचसंदर्भात आज (शनिवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे.

या बैठकीत भाजप सरकार विरोधी महाआघाडी उभी करण्याच्या संदर्भात या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. “भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. तिसरी आघाडी करण्यापेक्षा २०१४ सालच्या गोपीनाथ मुंडे यांच्या महायुतीप्रमाणे एक व्यापक महाआघाडी करणे हिताचे ठरेल,” असे सूचक वक्तव्यही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “दोन्ही नेत्यांमध्ये आघाडीबाबत चर्चा झाली आहे. परंतु आमची वंचित बहुजन आघाडी असून काँग्रेसला या आघाडीत यायचे असेल तर त्यांनी विचार करावा.” त्याचप्रमाणे “तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या आघाडीबाबतचा निर्णय आम्ही अजून घेतला गेलेला नाही”, अशी माहिती देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली आहे. या बैठकीत आमदार कपिल पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर उपस्थित होते.

औरंगाबाद वंचित बहुजन आघाडीच्या महाअधिवेशनात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी एकत्र दिसले. ओवेसी-आंबेडकरांच्या मैत्रीमुळे निश्चितच महाराष्ट्रातील राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत. आता यांच्यासोबत राजू शेट्टी देखील सामील होणार का याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दुसरी लाट संपलेली नाहीच, १८ जिल्ह्यांमध्ये कोरोना पुन्हा वेगाने वाढतोय!

News Desk

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘व्हर्च्युअल रॅली’चे आयोजन | जयंत पाटील

News Desk

शिवसेनेला अजान प्रेम असताना,गीतापठण उपक्रम कौतूकास्पद,आशिष शेलारांचा टोला

News Desk
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमध्ये मिनिबस दरीत कोसळून २० जणांचा मृत्यू

swarit

जम्मू | श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरून बनिहालहून रामबनच्या दिशेने जात असलेली मिनिबस दरीत कोसळली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने मिनिबसवरील केलामोठ येथील दरीत कोसळली माहिती मिळाली आहे. या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत.घटनास्थळी पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने मदत आणि बचाव कार्यास सुरू केले असून जखमींनां उधमपूर येथील सैनिकी रुग्णालयात दाखल केले आहे.

जेके १९,१५९३ नंबरची ही मिनिबस बनिहाल येथून रामबनच्या दिशेने जात होती. या बसमधून एकूण ३२ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी अपघाताची माहिती तातडीने पोलिसांना दिली. त्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्यास सुरू केली.

Related posts

सीएपीएफच्या कॅन्टीनमध्ये आता फक्त स्वदेशी वस्तुंचीच विक्री

News Desk

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार; रुग्णालयात दाखल

Aprna

न्यायमूर्ती रंजन गोगोई सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश

swarit