HW News Marathi
महाराष्ट्र

सरकारी नोकऱ्यांमध्ये अडीच लाख पदे रिक्त

मुंबई | शासनाच्या विविध विभाग आणि जिल्हा परिषदमध्ये सुमारे २ लाख ५० हजार पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्ती झाल्यानंतर नोकर भरती न केल्याने बाकीच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहेत. दरवर्षी किमान ५० हजार सरकारी कर्मचारी सेवा निवृत्त होतात. विविध विभागांमध्ये ६ लाख ९६ हजार ४१५ पदे रिक्त आहेत. तर जिल्हा परिषदेतील पदांसाठी मान्यता दिली गेली आहे. परंतु कित्येक वर्षांपासून मंजूर पदे भरण्यात आलेली नाहीत.

१९८९-९९ या काळामध्ये मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी आणलेल्या झिरो बजेटमुळे राज्यातील नोकर भरतीवर परिणाम झाला. त्यामुळे बेकारीचे प्रमाण वाढ गेले आहे. सर्वाधिक पदे गृह विभागात रिक्त आहेत. तसेच अल्पसंख्याक व पर्यावरण विभागाने आपली मंजूर पदे भरली आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये किमान १ लाख कर्मचारी निवृत्त झाले असून ही पदे भरण्यात आलेली नाहीत. अनेकदा मागणी करून सुद्धा शासनाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. अशी खंत महाराष्ट्र शासनाने व्यक्त केली.

रिक्त पदे असलेली विभाग

  • मराठी विभाग – २१४ पदे
  • शासनाच्या सर्व विभागातील – १ लाख ३० हजार ५१
  • जिल्हा परिषदातील -२६ हजार ६९८ पदे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘झोटिंग समितीचा अहवाल गायब करण्यामागे राष्ट्रवादी, शिवसेनेचा हात,’अतुल भातखळकरांचा घणाघात

News Desk

मुंबई उपनगरातील सोसायटींना बजावलेल्या अकृषिक कराच्या नोटीसींना स्थगिती! – आशिष शेलार

Aprna

नगरसेवक चोरुन सर्जिकल स्ट्राईकची फुशारकी मारणारे, राष्ट्रवादीकडे भीक मागतायत

News Desk
राजकारण

Shivsena Dasara Melava 2018 | सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता !

News Desk

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दस-या मेळाव्याच्या निमित्ताने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी पाकिस्तान व सर्जिकल स्ट्राइक संदर्भात बोलताना केंद्र सरकारच्या धोरणावर देखील उद्धव यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, सतत वल्लभभाई पटेलांचे नाव घेता. अहो मग तुम्ही काय करता, पाकिस्तानचे तुकडे करण्याऐवजी फक्त सोईचे राजकारण केले जात आहे. जर तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले आहे.

राज्य दुष्काळाने होरपळत आहे. हीच परिस्थिती कर्नाटकमध्ये देखील असलेली पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात केवळ दुष्काळावर चर्चा होत आहे पण तिकडे कर्नाटक सरकारने जुन्याच निकषाने दुष्काळ जाहीर केला. लवकरात लवकर दुष्काळ जाहीर केला नाही तर सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार असल्याचेही यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राहुल गांधींचे ट्विट  

News Desk

राज्यात लवकरात लवकर स्थिर सरकार स्थापन करण्याची गरज !

News Desk

अशोक चव्हाण यांना भाजपच्या ‘या’ नेत्यांनी दिली ऑफर

Aprna