HW News Marathi
क्रीडा

‘आशिया चषक २०१८’वर भारताने कोरले आपले नाव

मुंबई । ‘आशिया चषक २०१८’च्या अंतिम फेरीत अतुल्य अशी कामगिरी करत भारतीय क्रिकेट संघाने सातव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. कर्णधार रोहित शर्मा याच्या उत्कृष्ट नेतृत्वाखाली अत्यंत दमदार अशी कामगिरी करत भारताने ‘आशिया चषक २०१८’ पटकावले आहे. आणखी एक विशेष म्हणजे रोहित शर्मा हा आशिया चषक पटकावणारा तिसरा मुंबईकर कर्णधार ठरला आहे.

आशिया चषकामध्ये भारताने आपला कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानच्या संघाला दोन वेळा पराभूत केले आहे. या चषकात अफगाणिस्तानसोबतची बरोबरी सोडता भारतीय संघ बाकी एकाही सामन्यात अपयशी ठरलेला नाही.

भारताने १९८४ साली सर्वप्रथम आशिया चषक पटकावला होता. त्यावेळी सुनील गावस्कर हे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते. १९८४ साली आशिया चषकाचे जेतेपद पटकावले होते, तर श्रीलंकेने उपविजेतेपद पटकावले होते. त्यानंतर दुसऱ्या वेळेस कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी भारताला आशिया चषकाचे जेतेपद पटकावून दिले होते.आतापर्यंत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत सात वेळा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर हे दोघेही भारतीय क्रिकेट संघाचे मुंबईकर कर्णधार.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

स्टीव्हन स्मिथ आणि वॉर्नरवर एका वर्षाची बंदी

News Desk

कपिल देव यांनी केली समीक्षा, भारताच्या संघाचा का झाला पराजय

News Desk

मुंब्रा येथील व्हॉलीबॉल स्पर्धेत लखनऊ चा संघ विजेता

swarit
मुंबई

‘त्या’ला कुर्ला स्थानकात सापळा रचून पकडले

News Desk

मुंबई | कुर्ला स्थानकात उतरणाऱ्या ज्येष्ठ महिलांना एका इमारतीत नेत लुटले जात असल्याच्या घटनेने खळबळ उडाली. ‘माझे लग्न झाले आहे. त्या आनंदात आई वृद्ध महिलांना साडी वाटतेय,’ असे सांगून कुर्ला स्थानकात उतरणाऱ्या ज्येष्ठ महिलांना एका इमारतीत नेत लुटले जात होते. अखेर कुर्ला पोलिसांनी प्रवासी बनून कुर्ला स्थानकात सुरू केलेली शोधमोहीम मुंब्य्रापर्यंत पोहोचली. आणि ज्येष्ठ महिलांना लुटणाऱ्या मोहम्मद अमीर इरफान (२०) ला अटक करण्यात आली.

मुंब्रा येथे राहत असलेला इरफान हा आठवी पास आहे. गुन्हे मालिका, चित्रपटांमध्ये लुटीच्या घटना बघून, त्यानेही तसेच पैसा मिळविण्याचे ठरविले. आणि पैश्याच्या शोधात त्याने कुर्ला स्थानक गाठले. स्थानकातून एकट्या बाहेर पडणाऱ्या महिलांचा तो पाठलाग करत असे. पुढे त्या महिला एखाद्या इमारतीजवळ पोहोचताच तो त्यांना थांबवायचा. लग्न, मुलगा झाल्याच्या आनंदात आई वृद्ध गरीब महिलांना साड्या वाटत असल्याचे सांगायचा. महिला जाळ्यात येताच, त्यांना समोरच्या इमारतीकडे जायचे असल्याचे सांगून सोबत घेऊन जायचे, इमारतीजवळ येताच गरीब वाटावे म्हणून दागिने पिशवीत काढून ठेवा, असा सल्ला तो महिलांना देत होता. त्याच्यावर विश्वास ठेवत, महिला अंगावरील दागिने काढून पर्समध्ये ठेवत. ती पिशवी इरफानकडे देऊन त्या इमारतीत जाताच इरफान दागिने घेऊन पसार व्हायचा.

गेल्या काही दिवसांत अशा स्वरूपाच्या घटनांनी डोके वर काढले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पीएसआय सत्यवान पवार यांनी अंमलदार पठाण, भाबड, जोशी, पाटील आणि काळे यांच्यासह आरोपीचा शोध सुरू केला. आणि अखेर त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले.

Related posts

मुंबई शहरातील सुशोभीकरणाच्या कामात भ्रष्टाचार व ‘मॅचफिक्सींग’ भाजप आमदाराचा गंभीर आरोप

News Desk

पोलिस अधिका-याची दादागिरी सीसीटिव्हीत कैद

News Desk

पूर्व उपनगरांमधील उड्डाणपूलांखाली साकारणार ९ उद्याने

News Desk