HW News Marathi
मुंबई

लक्ष्यवेधचा ३६ वा “लक्षसिध्दी सोहळा” दिमाखात संपन्न

मुंबई | लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप ऍण्ड एक्सलन्स या संस्थेने ३६ व्या लक्षसिध्दी सोहळ्याचे आयोजन केले होते. नुकताच हा लक्षवेध चा “लक्षसिध्दी सोहळा” मैसुर असोसिएशन सभागृह माटुंगा येथे पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून एनएसडीएल (NSDL) या संस्थेचे उपाध्यक्ष मनोज साठे हे उपस्थित होते. या लक्षसिध्दी सोहळ्यामध्ये लक्षवेध संस्थेचे सर्वेसर्वा अतुल राजोळी यांनी मनोज साठे यांच्या सोबत “समृद्धीचा राजमार्ग” ह्या विषयावरील चर्चासत्र घेतले. यावेळी त्यांनी उद्योजकांच्या मनातील प्रश्न त्यांना विचारले.

“आयुष्यात तुम्ही किती पैसे कमावता ही गोष्ट महत्वाची नसते. समृद्धीचा राजमार्ग जर तुम्हाला मिळवायचा असेल तर “वा, वा, वा, वा” या तत्वाला आत्मसात करा. ह्या तत्वामधील पहिला ‘वा’ म्हणजे तुम्ही कमवलेले पैसे वाचवायला शिका, दुसरा ‘वा’ म्हणजे वाढ तुम्ही कमवलेले पैसे काही प्रमाणात गुंतवा जेणे करून त्यामध्ये वाढ होईल. तिसरा ‘वा’ म्हणजे पैश्यांचा वापर करा जेणे करून अर्थव्यवस्था प्रवाहात राहील आणि चौथा शेवटचा ‘वा’ म्हणजे पैसे वाटायला शिका तुमच्या कडील अधिक पैसे गरजू व्यक्तींमध्ये किंवा सामाजिक कार्यासाठी त्याचा वापर करा . हे तत्व तुम्ही पाळलेत तर यश नक्कीच तुमचे होईल’’ असे बहुमूल्य मार्गदर्शन मनोज साठे यांनी ३६ व्या लक्षसिध्दी सोहळ्यामध्ये उद्योजकांना केले.

व्यावसायिकांना दिग्गज वक्त्यांकडून मार्गदर्शन मिळावे आणि त्यांची व्यावसायिक वृद्धी व्हावी म्हणूनलक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप ऍण्ड एक्सलन्स असे परिसंवाद घेत राहील असे लक्षवेध चे संस्थापक अतुल राजोळी यांनी सांगितले. ३६ व्या लक्षसिध्दी सोहळ्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जुहू चौपाटीवर बुडालेल्या पाच जणांपैकी २ तरुणांचा मृत्यू

News Desk

वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीला भीषण आग

News Desk

विरोधी पक्षांचे सभागृहात ठिय्या आंदोलन, राज्यपालांची घेणार भेट

News Desk
मुंबई

श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवडू कलाकार आणि चाहात्यांची गर्दी

News Desk

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरीच्या सेलिब्रेशन स्पोर्टस क्लबमध्ये ठेवण्यात आले. दुपारी ३.३० वाजता पार्लयाच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. श्रीदेवींच्या अंतिम दर्शनासाठी दिग्गज नेत्यासंह, अख्खं बॉलिवूड आणि टॉलिवूडही लोटल्याचे दिसत आहे.

अजय देवगन, जॅकलीन फर्नांडिस, बच्च कुटुंबिय, अक्षय खन्ना, सुभाष घाई, हेमा मालिनी, करण जौहर, उर्वशी रौतेला, ठाकरे कुटुंबीय आणि अरबाज खान आणि माधुरी दीक्षित बॉलिवूडच्या कलाकारांनी श्रीदेवींचे अंत्यदर्शन घेतले. श्रीदेवी यांचे अखेरचे दर्शन व्हावे, यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर चाहत्यांची गर्दी झाली आहे.

Related posts

होळीच्या उत्सवात ‘पब्जी गेम’च्या प्रतिमेचे दहन

News Desk

ताडदेव आरटीओ कँटीनमध्ये आग 

swarit

हार्बर मार्गावरील रेल्वेची वाहतूक विस्कळीत

swarit