HW News Marathi
मनोरंजन

आगमन बाप्पाचे | गणेशोत्सवासाठी वाद्यांना मोठी मागणी

धनंजय दळवी | आता गणेशोत्सव अवघ्या ११ दिवसांवर येऊन ठेपल्याने, भजनी बुवा आणि गणेश मंडळांनी स्वत:कडे असलेली तालवाद्ये दुरुस्तीसाठी काढली आहेत, तर काहींनी नव्याने खरेदी करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे या काळात तालवाद्यांना मोठी मागणी असते. गणेशोत्सव म्हटला की, भजन आणि आरत्यांची आरास आलीच. त्यामुळे दादरच्या मार्केटमध्ये तालवाद्यांसाठी मोठी वर्दळ दिसून येत आहे. ढोलकी, मृदंग, तबला, डग्गा, पखवाज या वाद्यांची आवक वाढली आहे.

मुंबईतल्या तालवाद्यांना कोकणात चांगली मागणी असल्यामुळे, शहरातील लोक कोकणात तालवाद्ये नेण्यासाठी एकच गर्दी करू लागले आहेत. दादरच्या बाजारात तालवाद्य, ढोलकीला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले. गणपतीच्या आरतीसाठी ढोलकी हे वाद्य प्रामुख्याने लागते. त्यामुळे ढोलकीच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तालवाद्यांच्या चामड्याची गॅरंटी दिली जात नाही, परंतु वाद्याचे खोड किंवा इतर भाग नादुरुस्त झाल्यास, त्यावर स्वत: प्रयोग न करता थेट कारागिरांकडे घेऊन येण्याचा असा सल्ला विक्रेत्यांनी दिला. ही वाद्य लाकडी आणि पुठ्यांचे अश्या दोन्ही प्रकारात मिळतात. यावर बकरीच्या चामड्याचे आवरण असते.

अश्याप्रकारे आहेत तालवाद्यांचे दर

लाकडी ढोलकी पंधराशे ते साडेतीन हजार, तर पुठ्यांची ढोलकी ४५० ते ५०० रुपये, तबला आणि डग्गा पाच ते साडेपाच हजार, मृदुंग सहा ते साडेसात हजार, कांस्याचे (काशाचे) टाळ ५०० ते ८०० रुपये आणि पितळीचे टाळ ४०० ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. सर्व वाद्य दहिसर येथे बनवली जातात. तसेच तालवाद्यांसाठी लागणारे चामडे बकरीचे वापरले जाते, अशी माहिती तालवाद्यांचे विक्रेत्यांनी एच डब्लूला दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लातुरची शिक्षिका कौन बनगो करोडपतीमध्ये..

News Desk

स्टेजवरच फाटला दयाचा लेंगा

News Desk

व्हॅलेंटाईन-डेच्या आठवड्यात होणार संजय जाधवचा ‘लकी’ रिलीज

News Desk
राजकारण

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी सर्वाधिक कामे केली | विनायक मेटे

News Desk

बीड | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्यानंतर जातीचे राजकारण करु पहाणा-या अनेकांनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राज्याचे मुख्यमंत्री ब्राम्हण असल्यामुळे मराठा समाजाला ते न्याय देऊ शकत नाहीत असे अनेकांचे मत होते. परंतु सध्या मराठा समाजाचे आरक्षण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे या वादावर सध्या पडदा पडला आहे. परंतु मंगळवारी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असले तरी मराठा समाजासाठी त्यांचे सर्वाधिक काम आहे, असे वक्तव्य आमदार विनायक मेटे यांनी केले आहे. ते बेलगावमध्ये एका भूमिपुजनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी बोलताना विनायक मेटे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सुटावा यासाठी सर्वाधिक प्रयत्न देखील मुख्यमंत्री फडणवीस करत आहेत. आधीच्या सरकारमध्ये अनेक कामे सांगून देखील होत नव्हती. मात्र, आता राज्यात आणि जिल्ह्यात विकासाची मोठी कामे होत आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

Related posts

सचिन तेंडुलकरांच्या सुरक्षेत घट, तर आदित्य ठाकरेंना ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा

News Desk

… तर पद्मभूषण पुरस्कार परत करणार, अण्णा हजारेंचा इशारा

News Desk

अखेर नवाब मलिकांनी मागितली अण्णा हजारेंची माफी

News Desk