HW News Marathi
मुंबई

बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक होणार अंडरग्राऊड

मुंबई | दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. आता हे स्मारक महापौर बंगल्याऐवजी बंगल्याच्या तळघरात म्हणजेच अंडरग्राऊड बनविण्यात येणार आहे. त्यामुळे महापौर बंगल्यासारखी ऐतिहासिक वास्तू जैसे थे रहाणार आहे स्मारकासाठी या बंगल्याची कोणतीही तोडफोड किंवा येथील झाडांचीही कत्तल होणार नाही. पुरातत्व विभागाकडून ‘ब’ दर्जा मिळालेली ही वास्तू ऐतिहासिक आहे. त्यामुळे या वास्तूचे जतन करुन त्याचे पर्यटनात रुपांतर होईल. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतला आहे.

महापौर बंगल्याची वास्तू २३०० स्वेअर फूट एवढी असल्यामुळे बाळासाहेबांचे स्मारक बांधण्यासाठी वास्तूची जागा अपुरी पडते. तर अंडरग्राऊंड परिसर हा तब्बल ९००० स्वेअर फूटांवर पसरलेला आहे. त्यामुळे स्मारकासाठी अंडरग्राऊंड परिसराचा पुरेपूर वापर होईल आणि बंगला परिसरातील लॉन्सही अबाधित राहिल.

महापौर बंगल्याविषयी थोडक्यात

मुंबईतील ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारतींपैकी एक असलेला महापौर बंगला दादर चौपाटी लगत आहे. सन १९२८ साली हा बंगला बांधण्यात आला होता, त्यानंतर १९६२ साली मुंबई महापालिकेने हा बंगला विकत घेतला. तर डॉ. बी. पी. देवगी यांना महापौर म्हणून या बंगल्यात राहण्याचा पहिला मान मिळाला.

सन १९६४-६५ मध्ये या बंगल्याचा महापौरांसाठी अधिकृतपणे वापर करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे ज्या शिवाजी पार्कमधून दसरा मेळाव्याला शिवसैनिकांना संबोधित करायचे, तेथून जवळच हा महापौर बंगला आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी हेच ठिकाण उत्तम असल्याचे मुंबई ऐतिहासिक वारसा संवर्धन समितीने म्हटले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मतदान करा, लॉजिंगमध्ये डिस्काऊंट घ्या

News Desk

भिवंडीतील इमारतीला भीषण आग

News Desk

दिवाळीच्या मुहूर्तावर म्हाडाने मुंबईकरांना दिली ही आनंदाची बातमी

swarit
देश / विदेश

2007 Hyderabad Twin Blasts Case | एनआयए स्पेशल कोर्टाने आरोपींना ठरवले दोषी

News Desk

हैद्राबाद | हैद्राबादमध्ये २५ ऑगस्ट २००७ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए स्पेशल कोर्टाने मंगळवारी आरोपींना दोषी ठरवले आहे. मंगळवारी कोर्टाने आपला निर्णय जाहीर करताना अनिक शफीक सय्यद आणि मोहम्मद अकबर यांना दोषी ठरवले आहे. तर दोन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

या स्फोटामध्ये ४२ लोकांचा मृत्यू झाला होता तर ५० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. या दोन बॉम्ब स्फोटामध्ये एक स्फोट गोकुल चाट भंडारमध्ये तर दुसरा व्यस्तम टूरिस्ट स्पॉट लुम्ब‍िनी पार्क येथे झाला होता.

Related posts

आज कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवरून परतणार मायदेशी, संपूर्ण भारताचे लक्ष

News Desk

नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती! – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Manasi Devkar

‘मोदी सरकारच्या कार्यकाळात राममंदिर होणारच नाही’

News Desk