HW News Marathi
राजकारण

क्रिकेट विश्वाचा पहिला सम्राट हरपला | आठवले

मुंबई | भारतीय क्रिकेटची गुणवत्ता जागतिक स्तरावर पहिल्यांदा सिद्ध करणारा क्रिकेटविर अजित वाडेकर होते. कसोटी क्रिकेटपटू, कर्णधार , प्रशिक्षक अश्या सर्व भूमिकांतून आपल्या गुणवत्तेचा क्रिकेटरसिकांच्या मनात कायमचा उमटविलेले आणि संपूर्ण आयुष्य क्रिकेट जगलेल्या अजित वाडेकर यांच्या निधनाने क्रिकेटविश्वाचा पहिला अनभिषिक्त सम्राट हरपला आहे अश्या शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत अजित वाडेकर यांना आदरांजली वाहिली आहे.

दिवंगत अजित वाडेकर यांनी कसोटी क्रिकेट च्या सलग तीन सिरीज त्यांच्या कर्णधारपदाच्या काळात भारताला जिंकून दिल्या. परदेशात पहिला विजय भारतीय क्रीकेट संघाला मिळवून देणारे पाहिले कर्णधार ते होते. अजित वाडेकर हे अर्जुन पुरस्काराचे तसेच भारताच्या अत्यंत सन्मानाच्या पद्मश्री किताबाचे ते मानकरी ठरले होते.

दिवंगत अजित वाडेकर यांनी प्रशिक्षक पदाच्या काळात अनेक क्रिकेटपटू घडविले.त्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून ही खूप मोठी कामगिरी केली आहे. अजित वाडेकर या महान क्रिकेटविराच्या निधनाने भारतीय क्रिकेट विश्वाची मोठी हानी झाली आहे अशी शोकभावना रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नाशिक पदवीधर निवडणुकीत ‘मविआ’कडून शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर

Aprna

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश

Chetan Kirdat

ठाकरे-पवारांच्या विमान प्रवासाची चर्चा

News Desk
मुंबई

अनधिकृत बांधकामांना अधिकृत करण्यास न्यायालयाचा नकार

News Desk

नवी मुंबई | राज्यातील कोणतीही अनधिकृत बांधकामे अधिकृत करता येणार नाहीत, असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे एमआयडीसी आणि सिडकोच्या हद्दीतील येथील बेकायदा बांधकामप्रकरणी तेथील रहिवाशांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाकडून नकार देण्यात आला आहे.

“राज्य सरकारने एमआरटीपीमधील कलम ५२ (अ) मध्ये केलेली सुधारणा ही खरतर अवैध आहे. पण, आम्ही त्याला अवैध ठरवत नाही. मात्र, जी बांधकामे विकास आराखडा व विकास नियंत्रण नियमावलीच्या विरुद्ध असतील त्या बांधकामांना राज्य सरकार अभय देणार नाही”, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे एमआयडीसीच्या जागेवरील दिघ्यातील अनधिकृत इमारतींवर देखील कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे. दिघ्यातील इमारतींमध्ये सर्वसामान्य लोक राहतात त्यामुळे राज्य सरकारकडून माणुसकीच्या दृष्टीने दिघ्यातील बांधकामे नियमित करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे.

Related posts

कुर्ला ते विद्याविहार दरम्यान तांत्रिक बिघाड, वाहतूक २० मिनिटे उशिराने

News Desk

रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्षांचा सत्कार समारंभ

swarit

…अन् खेळता खेळता जीव गेला

News Desk