HW News Marathi
देश / विदेश

बँकेपेक्षा जास्त व्याज देईन | नितीन गडकरी

नवी दिल्ली | माझ्याकडे गुंतवणूक केली तर बँकेपक्षा जास्त व्याज देऊन, असे विधान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. तुम्ही राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय)च्या बॉण्डमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला बँकांपेक्षा जास्त व्याज मिळेल, असे नितीन गडकरी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या २५ व्या वर्षाच्या कार्यक्रमात बोलत होते.

पुढे असे देखील म्हटले की, आमचे टोल कलेक्शन चांगले आहे. आमची रेटिंग ट्रिपल ए आहे. भारतात गुंतवणूकदारांना बँकेडून जेवढे व्याज मिळते. त्या पेक्षा जास्त व्याज मी देऊ शकतो, असे गडकरी म्हणाले. तसेच रस्त्यांबरोबरच शिपिंगमध्येही तुम्ही गुंतवणूक करू शकता कारण आमची पोर्टही फायद्यामध्ये आहेत, असा सल्ला गडकरींनी दिला. एनएचएआयला बॉण्डच्या माध्यमातून ६३ हजार कोटी रुपये जमा करायचे आहेत. मागच्या वर्षी एनएचएआयने ५२ हजार कोटी रुपये जमा केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Union Budget 2021 |  वीज ग्राहकांना वीज कंपनी निवडण्यासाठी पर्याय मिळणार

News Desk

श्रीलंकेत सुरक्षा दलाची कारवाई, ३ दहशतवाद्यांसह १५ जणांचा खात्मा

News Desk

फ्रेंडशीप डे का ? साजरा केला जातो

swarit
मुंबई

मुंबईतील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा, एका विद्यार्थिनीचा मृत्यू

swarit

मुंबई | गोवंडीच्या शिवाजीनगरमधील पालिकेच्या संजय नगर महापालिका उर्दू माध्यमातील शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. पालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या औषधातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. चांदणी साहिल शेख असे या १२ वर्षीय दुदैवी विद्यार्थिनीचे नाव आहे. तर जवळपास ५० ते ६० मुलांना रुग्णालयात विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना पालिकेच्या औषधांमुळे ही विषबाधा झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजल्यापासून शाळेतील मुलांना रुग्णालयात उलट्यांचा त्रास होत असल्याने प्रकृती बिघडल्याने त्या सर्वांना रुग्णालयात दाखल केले गेल. ही सर्व मुले एकाच शाळेतील असल्याचे समोर आले आहे. एका मुलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

शाळेतील विद्यार्थ्यांना कॅल्शियम, रक्तवाढीची औषधे दिली जात होती. परंतु या औषधांनी विद्यार्थ्यांना उलट्या जळजळ होऊ लागली. राजावाडी रुग्णालयात या मुलांना अॅन्टीबायोटीक्स देण्यात दिले आहे. परंतु मुलांना नक्की कशातून विषबाधा झाली याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.

Related posts

तिसऱ्या दिवशीही जे जे रुग्णालयातील डॉक्टरांचे आंदोलन सुरु

News Desk

सुप्रियाजी मला फक्त १५ दिवस द्या…!

News Desk

मंत्रालयात ७० वर्षीय वृद्ध शेतकऱ्यानी केला आत्महत्येचा प्रयत्न

News Desk