HW News Marathi
राजकारण

राजीव गांधींनी जे केले नाही ते भाजपने करुन दाखविले

नवी दिल्ली | भाजप सरकारने आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरून (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदीनी) सुरू करण्यात आले आहे. यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या यादीत जवळपास ४० लाख नागरिकांची नावे नाहीत. या घटननंतर तीव्र पडसाद संसदेत उमटलेले आज पहायला मिळाले.

काँग्रेसने आसाम करार लागू केले, परंतु राजीव गांधींनी हा करार अंमलात आणण्याची हिंमत मात्र केली नाही. परंतु भाजप सरकारने हे करून दाखविले. असे अमित शहा यांनी राज्यसभेतील भाषणा दरम्यान असे विधान केले. शहांच्या या विधानानंतर गोंधळ केला. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सचे मूळ काय, हे रजिस्टर कुठून आले, हे कोणीही सांगत नाही, असे अमित शहा राज्यसभेत म्हणाले.

१४ ऑगस्ट १९८५ मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधींनी आसाम करार लागू केला. हा करार आसाममध्ये अवैधरित्या घुसखोरी करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांना सिटिजन रजिस्टरमधून वगळून एक नॅशनल रजिस्टर तयार केले होते. अशी नोंद या करारा होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आदित्य ठाकरेंचा हिरव्या बॅनरवरचा व्हायरल फोटो, नेमकं खरं काय ?

News Desk

गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशाने पक्षाला बळ मिळालं! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Manasi Devkar

वरळीत गल्लीगल्लीत फिरायला लावणार, पण विजय माझाच होणार! – आदित्य ठाकरे 

Aprna
क्राइम

नक्षलींशी लढताना २४ वर्षिय पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू

News Desk

गडचिरोली – या नक्षलग्रस्त जिल्ह्यात पोलिसांकडून नक्षलींच्या विरोधात विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानादरम्यान, नक्षलींच्या हल्ल्यात नव्हे, तर हृदयिवकाराच्या तीव्र धक्क्याने एका २४ वर्षिय पोलीस जवानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना १९ ऑगस्ट रोजी घडली. आशिष बळवंत कुमरे (२४) असे या पोलीस जवानाचे नाव असून कुरखेडा पोलीस उपविभागाच्या मुख्यालयात गडचिरोली पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्याला मानवंदना दिली.

कुरखेडा पोलीस उपविभागांतर्गत शीघ्र प्रतिसाद पथक कोरची पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लक्ष्मीपूर जंगलात १९ ऑगस्ट रोजीच्या सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला. घनदाट जंगलातील डोंगर उतरत असताना आशिष याला अचानक अस्वस्थ वाटून छातीत दुखू लागले. सहकाऱ्यांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून त्याला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

Related posts

आमदार नितेश राणे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

News Desk

गोव्यातील कार अपघातात पुण्यातील एक ठार

News Desk

गौरी लंकेश हत्येप्रकरणी बेळगावमधून आणखी एक जण ताब्यात

Gauri Tilekar