HW News Marathi
देश / विदेश

‘अडीच लाख’ ग्रामपंचायती वायफायने जोडणार | मनोज सिन्हा

नवी दिल्ली | ‘संसद आदर्श ग्राम योजना’ अंतर्गत लोकसभा सदस्यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये जवळपास २५००० मोफत ‘वायफाय’ची सुविधा देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केल्याची माहिती संप्रेषणमंत्री मनोज सिन्हा यांनी बुधवारी लोकसभेत दिली. लोकसभा सदस्यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये जवळपास २५००० वायफाय हॉटस्पॉट स्थापन करण्यात येणार आहेत. ‘भारतीय संचार निगम लिमिटेड’ तर्फे ही सेवा पुरविण्यात येणार आहे.

तसेच ही सेवा यशस्वी झाल्यानंतर भविष्यात इतरही टेलीकॉम कंपन्यांच्या सेवेचा लाभ घेता येणार असल्याचे ते म्हणाले. भारत नेट प्रकल्पांतर्गत भारतातील अडीच लाख ग्राम पंचायतींना ऑप्टीकल फायबर लिमिटेडमार्फत एकमेकांशी जोडण्याचे सरकारचे ध्येय आहे. डिसेंबर २०१७ पर्यंत डिजिटल भारत कार्यक्रमांतर्गत दीड लाख ग्राम पंचायती जोडल्या गेल्या आहेत आणि मार्च २०१९ पर्यंत अतिरिक्त एक लाख ग्राम पंचायती जोडण्याचे सरकारचे ध्येय आहे.

हाय स्पीड इंटरनेटच्या माध्यमातून ही सेवा देण्यात येणार आहे. १५ जुलै पर्यंत १ लाख १३ हजार पंचायती जोडण्यात आल्याची माहिती सिन्हा यांनी दिली आहे. यामुळे नफा मिळविण्यासाठी सुरुवातीला बीएसएनएल तर्फे सेवा पुरविण्यात येत आहे का ? असा प्रश्न सर्वच स्तरातून उपस्थित होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन पुर्णपणे उघडणार नसल्याचे पंतप्रधानांनी दिले संकेत

News Desk

मोदी सरकारची आज कसोटी, टीडीपी, कॉँग्रेसचा अविश्वास प्रस्ताव

News Desk

कर्ज होणार स्वस्त, रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कपात

News Desk
राजकारण

Shivsena Dasara Melava 2018 | सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता !

News Desk

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दस-या मेळाव्याच्या निमित्ताने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी पाकिस्तान व सर्जिकल स्ट्राइक संदर्भात बोलताना केंद्र सरकारच्या धोरणावर देखील उद्धव यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, सतत वल्लभभाई पटेलांचे नाव घेता. अहो मग तुम्ही काय करता, पाकिस्तानचे तुकडे करण्याऐवजी फक्त सोईचे राजकारण केले जात आहे. जर तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तान शिल्लकच राहिला नसता, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले आहे.

राज्य दुष्काळाने होरपळत आहे. हीच परिस्थिती कर्नाटकमध्ये देखील असलेली पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात केवळ दुष्काळावर चर्चा होत आहे पण तिकडे कर्नाटक सरकारने जुन्याच निकषाने दुष्काळ जाहीर केला. लवकरात लवकर दुष्काळ जाहीर केला नाही तर सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार असल्याचेही यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राहुल गांधींचे ट्विट  

News Desk

राज्यात लवकरात लवकर स्थिर सरकार स्थापन करण्याची गरज !

News Desk

अशोक चव्हाण यांना भाजपच्या ‘या’ नेत्यांनी दिली ऑफर

Aprna