HW News Marathi
क्राइम

अहमदनगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

अहमदनगर | अहमदनगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात पाच वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू शिवारात रविवारी पहाटे ट्रक आणि स्कॉर्पिओमध्ये हा भीषण अपघात झाला. या अपघातात द्रोपदाबाई भाऊसाहेब कातोरे (वय ७०), रमेश भाऊसाहेब कातोरे (५१), बाळासाहेब लक्ष्मण माळवदे (वय ५०), दगडू आनंदा भांगे (वय ५०) आणि हनुमान अंबादास दुसे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

सत्यम रमेश कातोरे (वय १६) हा जखमी झाला असून त्याच्यावर जामखेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. हे सर्वजण खरवंडी, नेवासा तालुक्यातील रहिवासी असून आषाढी वारीनिमित्ताने पंढरपुला गेले होते. पंढरपुरातील दर्शन झाल्यानंतर सर्वजण घराच्या दिशेने येत असताना अहमदनगर-सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने 72 तासात केला हत्येचा उलगडा

News Desk

कल्याणमध्य़े राडा,तलवारीने वार, 25 जणांविरोधात गुन्हा दाखल

News Desk

वांद्रे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तब्बल 68 कोटी वसूल

Aprna
देश / विदेश

काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये दिवसेंदिवस दहशतवादी कारवाया वाढत आहेत. काश्मीरमधील कुलगाम येथे रविवारी पहाटेच्या सुमारास सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या परिसरात अजून काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सुरक्षा दलाने या परिसरातील दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू आहे.

जम्मू काश्मीर पोलीस दलातील पोलीस शिपाई सलीम शाह यांचे शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी अपहरण करून निर्घृण हत्या केली. शहीद सलीम शाह दक्षिण काश्मीरमधील कुलगामचा रहिवासी होता. पोलीस दलातील जवानांच्या अपहरण करून हत्या केल्याने संपूर्ण काश्मीरमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यांचा मृतदेह कुलगाम परिसरात आढळून आला. सलीम हा कथुआमध्ये कार्यरत असून तो सध्या रजेवर होता. दहशतवाद्यांनी कुलगाम जिल्ह्यातील मुथलामा भागातील सलीमला त्यांच्या घरातून अपहरण केले होते.

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलातील जवानांना अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आलेली ही पहिली घटना नाही. या आधी ईदच्या सुट्टीसाठी परतत असताना दहशतवाद्यांनी मुघल रोडवरून त्यांचे अपहरण केले होते. औरंगजेब हा ४४ राष्ट्रीय रायफल्सचे जवान असून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

 

Related posts

नागरिकत्व विधेयकाविरोधात शहांवर निर्बंध लादण्याची अमेरिकन आयोगाची मागणी

News Desk

पाकिस्तानला नरेंद्र मोदीशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकणार नाही !

News Desk

राहुल गांधींचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार ! नाना पटोले

News Desk