HW News Marathi
मुंबई

कुर्ल्याच्या भुयारी मार्गातून प्रवास करताय सावधान !

मुंबई । कुर्ला पूर्व व पश्चिमेला जोडणा-या भुयारी मार्गाचे उदघाटन धुमधडाक्यात करण्यात आले. हा भुयारी मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. मात्र आता या भुयारी मार्गाची दुराव्यस्था झाली असून नागरिकांची गैरसोय झाली आहे. भुयारी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याचे पहायला मिळत आहे. पावसाळ्यात पाणी भरणे, अस्वच्छता तसेच बेवडे, गर्दुल्ले यांचा वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. भुयारी मार्ग जणू काय त्यांच्यासाठीच बांधलाय की काय? असा प्रश्न सामान्यांना पडत आहे.

या भुयारी मार्गाचे काम गेली अनेक वर्ष सुरु होते. तसेच काही महिन्याआधी उदघाटन करण्यात आले. यावेळी नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित होते. मोठ्या धुमधडाक्यात भुयारी मार्गाचे उदघाटन करण्यात आले. हा भुयारी मार्ग पादचाऱ्यांसाठी आहे की गर्दुल्यांसाठी असा प्रश्न निर्माण होतो? सध्या मोठ्या प्रमाणात गर्द्दुल्यांचा वावर याठिकाणी पहायला मिळत आहे. त्यामुळे हा भुयारी मार्ग गर्द्दुल्ले आणि दारुड्यांचा अड्डा बनला आहे.

दरम्यान,जनतेच्या सुरक्षेसाठी भुयारी मार्गात सीसीटीव्ही आणि सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार असे सांगण्यात आले होते. पण इथे सीसीटीव्ही आहेत पण सुरक्षा रक्षक नाही आणि सीसीटीव्ही सुरू आहेत की बंद हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे सदर भुयारात कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण ?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम अपेक्षित वेळेच्या आत पूर्ण केले जाईल! – मंत्री उदय सामंत

Aprna

विधानसभा अध्यक्षांच्या अविश्वास ठरावाच्या मुद्यावरून दोन वेळा सभागृह तहकूब

News Desk

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

News Desk