HW News Marathi
महाराष्ट्र

आज मराठा आरक्षणाचा निकाल

मुंबई | मराठा आरक्षणाचे काय झाले ? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला होता. न्यायालयाने राज्य सरकारला मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी शुक्रवारपर्यंतची संधी दिली होती. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आज काय भूमिका मांडणार याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

विनोद पाटील यांनी डिसेंबर २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. की, मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापुर्वीच घेण्यात यावा. जेणे करून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा मागास प्रवर्ग आयोगाकडे प्रलंबित आहे. आरक्षणाचे कुठलेही काम दिसत नसल्याने आयोग आणि राज्य सरकारने वेळ मर्यादेच्या आधीच पडताळणी करुन मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यावा असे मुंबई उच्च न्यायालयाने राज्यसरकारला मागील आठवड्यात सुनावणी दरम्यान बजावले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आज शुक्रवार दिनांक २९ जून रोजी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात सुणावणी होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए |

News Desk

या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ? फडणवीसांचा सवाल !

News Desk

मराठा आरक्षणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

News Desk
महाराष्ट्र

भिमा कोरेगावचे पडसाद उल्हासनगरात . संपुर्ण शहर बंद .

News Desk

उल्हासनगर : १ जानेवारी रोजी भिमाकोरे गांव येथे जातीयवादी समाजकंटकानी स्तंभाला अभिवादन करन्यासाठी आलेल्या भिमसैनिकांवर दगडफेक करुन गाड्या जाळल्याचा अमानुष प्रकार केल्याने संतप्त झालेल्या आंबेडकरी समाजाने उल्हासनगर शहर बंद केले आहे . तर शहरात पोलिस बंदोबस्त वाढविन्यात आला असुन कोणताही अनुचित प्रकार घडला नाही .

भिमाकोरे गांव येथे स्तंभाला अभिवादन करन्या करिता येणाऱ्या बहुजन बांधवांवर तेथिल जातीयवादी समाजकंटकानी इमारतीच्या गच्चीवरुन दगडफेक करुन नंतर गाड्या जाळण्याचा अमानुष प्रकार केला . तर महीला लहान मुलांवर ही दगडफेक केल्याने याचे पडसाद सर्वत्र पसरले आहे . त्यामुळे येथिल आंबेडकरी समाजाने रस्त्यावर उतरुन उल्हासनगर शहर बंद केले आहे . शहरातील रिक्षा चालकानी देखिल या बंद मध्ये सहभागी होवुन रिक्षा बंद ठेवल्या आहेत . तर पोलिसानी शहरभर चोख बंद ठेवल्याने कोणता ही अनुचित प्रकार घडला नाही .

Related posts

“योगींनी फक्त मशिदीवरील नाही तर यूपीमध्ये मंदिरावरील भोंगे देखील बंद,” अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

Aprna

‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून अण्णांची जनजागृती सुरू

News Desk

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा मागासवर्गीय आयोगाकडे

News Desk