HW News Marathi
कृषी

अमित शहांना शेतकऱ्यांपेक्षा माधुरी महत्त्वाची | अशोक चव्हाण

सांगली | शेतकऱ्यांच्या घरी जाण्यास वेळ नसलेल्या अमित शहा यांना मात्र अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या घरी जाण्यास वेळ मिळतो. शहा जरी माधुरीचे फॅन असले, तर त्यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाण्यास देखील वेळ द्यावा अशा शब्दात काँग्रेसचे प्रेदशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगलीत होणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला. देशातील शेतकरी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी १ जूनपासून संपावर गेले आहेत. शेतकरी संपाचा आधार घेत चव्हाणांनी भाजपवर खोचक शब्दात टीका केली.

भाजप-शिवसेना यांच्या बैठकीवर देखील चव्हाण यांनी टीका केली आहे. भाजप-सेना हे देन्ही पक्ष एकमेकांवर दबाव आण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही पक्ष केवळ सौदेबाजीसाठी एकत्र आले असून अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेली बैठक ही सौदेबाजीच असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बुधवारी मुंबई दौऱ्यावर आले होते. शहा हे भाजपच्या संपर्क फॉर समर्थन या अभियाना अंतर्गत मुंबई दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान शहा यांनी उद्योगपती रतन टाट आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची भेट घेतली.

तसेच भीमा-कोरेगाव दंगलीप्रकरणी भाजप सरकार एल्गार परिषदेच्या आयोजकांनर गुन्हे दाखल केले असून पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई सुरू असल्याचे चव्हाण यावेळी म्हटले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा एल्गार परिषदेच्या आयोजकांवर कारवाई करुन लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला आहे. याप्रकरणात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा देखील सहभाग असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर, भाजपने त्याचे पुरावे द्यावे असा थेट सवाल चव्हाण यांनी सरकारला केला आहे. या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांनी विविध मुद्यांचा आधार घेऊन भाजप सरकारवर निशाणा साधला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

योगी म्हणतात ऊसाचे पीक घेऊ नका, डायबेटीस होईल

News Desk

शेतकरी पुत्राची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

News Desk

तूर, उडीद दर हजारांनी घसरले, विक्रीची तूर्त घाई नको

News Desk
महाराष्ट्र

पहिल्या पावसात पैनगंगेला दुथंडी

swarit

किनवट | मराठवाडा म्हटले की डोळ्यापुढे येते ते दुष्काळाचे भयाण दृश्य, ओस पडलेल्या जमिनी आणि कोरड्या पडलेल्या नद्या. नांदेड जिल्यातील किनवट ची पैनगंगा नदी आज जवळपास ३ वर्षांनंतर दुथंडी भरून वाहत आहे. त्यामुळे परीसरातील लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.

औरंगाबादमध्ये उगमानंतर ती आग्नेयीकडे बुलढाणा व अकोला या जिल्ह्यांच्या दक्षिण भागातून वाहते. पुढे ती परभणी-यवतमाळ व यवतमाळ-नांदेड या जिल्ह्यांच्या सरहद्दींवरून वाहत जाऊन यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील जुगादजवळ वर्धा नदीला मिळते. हा संयुक्त प्रवाह वर्धा नदी म्हणून ओळखला जातो.

कयाधू अरुणावती अडाण, वाघाडी, पूस आदी पैनगंगेच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. जलसिंचनाच्या दृष्टीने या नदीस अधिक महत्त्व असून, अप्पर पैनगंगा प्रकल्पानुसार या नदीवर यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यात इसापूरजवळ धरण बांधले आहे. त्यापासून शेतीस पाणीपुरवठा केला जातो.

Related posts

राजभवनात ‘ती’ १२ नावांची यादी सुरक्षित!

News Desk

MPSC बाबत मुख्यमंत्री लवकरचं मोठी घोषणा करणार!

News Desk

“राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरपला”, अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली

Aprna