HW News Marathi
कृषी

बोंड अळी प्रादुर्भावामुळे तीन कंपन्यांवर गुन्हा दाखल

अमरावती | तीन बियाणे कंपन्यांच्या कापसाच्या वाणांवर १०० टक्के बोंड अळीचा प्रादुर्भाव असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. शेतकऱ्यांनी फुलांवर बोंड अळी दिसल्याच्या तक्रारी पंचायत समितीकडे केल्या. या तक्रारींनंतर बेनोडा पोलिसांनी संबंधित कंपन्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुका कृषी कार्यालयात आंदोलन केले. त्यानंतर मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.

प्राथमिक पाहणी अहवालात जिल्हास्तरीय समितीने संबंधित कंपन्यांच्या वाणांवर १०० टक्के बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे निरीक्षण नोंदवले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन केल्यानंतर अंकुर सीडस प्रायव्हेट लिमिटेड नागपूर, बायर बायोसायन्स प्रा. लि. माधापूर हैदराबाद, राशी सिडस प्रा. लि. अत्तुर, तामिळनाडू कारवाई करण्यात आली. राज्यात पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून अशा प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तूर, उडीद दर हजारांनी घसरले, विक्रीची तूर्त घाई नको

News Desk

नांदेड जिल्ह्यातील विविध पाणी पुरवठा प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतून ई-भुमिपुजन संपन्न

News Desk

राज्यात दूध आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलनकर्त्यांनी फोडल्या गाड्या

News Desk