HW News Marathi
कृषी

पंतप्रधान मोदी साधणार शेतक-यांशी संवाद

नवी दिल्ली | साखर उद्योगाच्या समस्या जाणून घेण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. आज नरेंद्र मोदी त्यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी ही भेट घेणार आहेत. साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी मागील काही काळात केंद्र सरकारकडून ज्या उपाय योजना करण्यात आल्या, त्यांची माहिती मोदी शेतकर्‍यांना या भेटीदरम्यान देणार आहेत.

तसेच ऊस उत्पादनाला चालना मिळण्यासाठी मोदी सध्या शेतक-यांशी संवाद साधून माहिती देणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, पंजाबसह अन्य ऊस उत्पादक राज्यातील दीडशे शेतकर्‍यांशी मोदी यावेळी संवाद साधणार आहेत अशी माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नांदेड जिल्ह्यातील विविध पाणी पुरवठा प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतून ई-भुमिपुजन संपन्न

News Desk

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत योजनेसाठी विविध घटकांनी 31 जुलै पर्यंत नोंदणी करा – कृषी विभागाचे आवाहन

News Desk

शेतकरी पुत्राची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

News Desk
महाराष्ट्र

आज मराठा आरक्षणाचा निकाल

News Desk

मुंबई | मराठा आरक्षणाचे काय झाले ? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला होता. न्यायालयाने राज्य सरकारला मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी शुक्रवारपर्यंतची संधी दिली होती. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आज काय भूमिका मांडणार याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

विनोद पाटील यांनी डिसेंबर २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. की, मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापुर्वीच घेण्यात यावा. जेणे करून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा मागास प्रवर्ग आयोगाकडे प्रलंबित आहे. आरक्षणाचे कुठलेही काम दिसत नसल्याने आयोग आणि राज्य सरकारने वेळ मर्यादेच्या आधीच पडताळणी करुन मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यावा असे मुंबई उच्च न्यायालयाने राज्यसरकारला मागील आठवड्यात सुनावणी दरम्यान बजावले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आज शुक्रवार दिनांक २९ जून रोजी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात सुणावणी होणार आहे.

Related posts

महाराष्ट्रातील जनतेच्या आशिर्वादाने मी सुखरूप आहे- मुख्यमंत्री

News Desk

येत्या विधानसभेत सेना-भाजप स्वतंत्र लढतील यात शंकाच नाही !

News Desk

शरद पवार आणि अजित पवारांची अचानक भेट, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

News Desk