HW News Marathi
कृषी

शेतकरी पुत्राची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

बुलढाणा | नांदुरा तालुक्यातील वाडी येथील रामेश्वर साहेबराव खाडे यांनी आज सत्यवान तोताराम खाडे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. सद्या खरीप हंगाम जवळ आला असून सरकारचे कर्जमाफीचे घोंगडे अद्याप भिजत असल्याने बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे पेरणी कशी करायची या द्विधा मनस्थितीत सापडल्याने या युवकाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

रामेश्वर यांचे वडील साहेबराव शामराव खाडे यांचे नावे मौजे वाडी येथे २.०३ हेक्टर शेती आहे. यावर्षी त्यांना अपेक्षित उत्पन्न झाले नव्हते. त्यांच्या शेतावर स्टेट बँक ऑफ इंडिया नांदुरा शाखेचे सन २०१२-१३ मध्ये ३० हजार रुपयांचे कर्ज असून कर्जमाफीबाबत कोणतेही पत्र बँकेकडून अद्यापपर्यंत त्यांना प्राप्त झाले नव्हते. कर्जमाफी नाही त्यातच जवळ पैसे नसल्याने पेरणी करावी तरी कशी या चिंतेने ही आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

प्रहार शेतकरी संघटनेचा करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा   

News Desk

‘हुमनी’ अळीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ 

News Desk

शेतकऱ्यांनी शेतीविषयक अभ्यास विदेश दौ-यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करा

News Desk
देश / विदेश

माओवाद्यांच्या निशाण्यावर नरेंद्र मोदी

News Desk

मुंबई | भिमा कोरेगाव प्रकरणात पाच आरोपींना अटक केल्यापासून नवनवीन माहीती समोर येत आहे. सर्वप्रथम अशी माहीती समोर आली की माओवादी देशात आणखी एक राजीव गांधी हत्याकांड करण्याच्या तयारीत आहेत. तर सध्या हाती आलेल्या माहितीनुसार हत्याकांडाचा हा कट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रचण्यात आला आहे.

१८ एप्रिल ला रोना जैकब द्वारा कॉमरेड यांना चिट्ठी लिहीली गेली होती ज्यात म्हटले होते हिंदू फॅसिझमला हरवणे गरजेचे झाले आहे. मोदींमुळे हिंदू फॅसिझम वेगाने वाढत आहे ज्यामुळे त्यांना रोकने गरजेचे आहे. त्याचबरोबर मोदींमुळे भाजप जवळपास १५ राज्यांमध्ये सत्तेत आले आहे आणि हे जर असेच चालत राहील तर माओवाद्यांना यामुळे धोका होऊ शकतो, त्यामुळे अजुन एक राजीव गांधी हत्याकांड करण्याचा माओवाद्यांचा हेतु आहे.

 

Related posts

सिलचर-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेसच्या ३ डब्यांना भीषण आग

News Desk

दहशतवादी आणि आपल्या गुप्तचर यंत्रणा एकसमान – माजी राॅ एजंट विनोद साहनी

News Desk

कोफी अन्नान यांचे निधन

News Desk