HW News Marathi
कृषी

साखरा येथे संवादपर्व कार्यक्रमात कृषीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन

विनोद तायडे,

वाशिम : शेतीवरील अवलंबित्व कमी करून शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यासाठी शेतीला जोडधंदा असणे आवश्यक आहे. शेतीपूरक व्यवसाय निर्मितीसाठी शासन विविध योजना राबविते. या योजनांचा लाभ घेऊन शेतकºयांनी छोटे-छोटे व्यवसाय सुरु करावेत, असे आवाहन समन्वयीत कृषी समृद्धी प्रकल्पाचे (केम)चे व्यवस्थापक सर्जेराव ढवळे यांनी केले. साखरा येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने व गणेशोत्सव मंडळाच्या सहकायार्ने आयोजित संवादपर्व कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी साखराचे उपसरपंच मोहन इंगळे, आदर्श गाव समितीचे अध्यक्ष रामराव इंगळे, शाळा व्यवस्थापन समितीचे रामप्रसाद इंगळे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर इंगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप, दिलीप काळे, प्रमोद राठोड, ग्राम कार्यकर्ता सुखदेव इंगळे आदी उपस्थित होते. ढवळे म्हणाले की, शेतकºयांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांचे शेतीवरील अवलंबित्व कमी होऊन उत्पन्नाची इतर साधने निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीला पूरक जोडधंदा हा चांगला पर्याय आहे. दुग्ध व्यवसाय, मत्स्यव्यवसाय, शेळी पालन, कुक्कुट पालन, मशरूम शेती यासारखे अनेक छोटे-छोटे शेतीला जोडधंदा म्हणून करता येणे शक्य आहे. त्याकरिता शासनामार्फत विविध योजनांमधून अनुदान सुध्दा उपलब्ध करून देण्यात येते. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतीतून उत्पादित होणाºया मालावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारल्यास शेतीमालाला चांगला दर मिळण्यासाठी मदत होऊ शकते. अशा उद्योगांना कृषी विभागाच्या योजना व बँकांमार्फत अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बोराडे म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. मानवाने मोठ्या प्रमाणात केलेली वृक्षतोड व पर्यावरणाची झालेली हानी यासाठी कारणीभूत आहे. तसेच भूगर्भातील पाण्याचा उपसा होत असल्याने भूजल पातली खालावली आहे. त्यामुळे पाणी टंचाईसारख्या संकटांना सामोरे जावे लागते. शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवून भूजल पातळीत वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये नागरिकांनीही सक्रीय सहभाग नोंदवावा. तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी संपाचा दुसरा दिवस, भाज्यांचे भाव गगनाला भिडणार

News Desk

माझं मत- तुमच्या शहरातील एटीएममध्ये पैसे आहेत का ?

News Desk

कै.वसंतराव नाईक जयंतीच्या दिवशी कृषी दिन साजरा करण्यात आला.

News Desk