HW News Marathi
कृषी

‘हुमनी’ अळीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ 

वर्धा । देवळी येथील शेत शिवारातील सोयाबीन व तूर पिकांवर सध्या हुमनी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने तेथील शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन आणि तूर पीक मुळासह उलथावून लावले जात आहे. सदर बाब काही शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक अस्मिता मेसरे तसेच प्रियंका आडे यांना सांगितली असता त्यांनी परिसरातील पिकांची पाहणी करून अहवाल तयार करीत तो वरिष्ठांना सादर केला आहे.

तालुक्यातील मौजा नागझरी व बेलगाव येथे हुमनी नावाच्या अळीचा सोयाबीन व तूर पिकांवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही अळी संपूर्ण झाड उलथावून लावत आहे. आधीच कमी पावसामुळे सोयाबीन पीक संकटात आहे. त्यातच हे संकट शेतकऱ्यांसमोर असल्याने उत्पादनात घट येण्याची भीती वर्तविली जात आहे. कृषी विभागाने याकडे लक्ष देत सोयाबीन व तूर उत्पादक शेतक-यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.परिसरातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता काही शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती कृषी अधिकारी यांना दुरध्वनीवरुन दिली.

या अळीचे भुंगे जमिनीवर येवून अंडी घालतात. याप्रकारे अंडीतून निघालेल्या अळीचा कुजलेल्या शेणखताचे माध्यमातून शेतापर्यंत प्रवास असतो. या अळीचा वेळीच नायनाट न केल्यास संपूर्ण पीक धोक्यात येण्याची भीती असते. अळीचा प्रादुर्भाव असलेल्या या भागात कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी व तालुका कृषी कार्यालयाचा पाहणी दौरा आयोजित केला आहे. हुमनी अळीचा प्रकोप असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संबंधित शेतांचे पंचनामे व उपाय-योजना केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी संपाचा दुसरा दिवस, भाज्यांचे भाव गगनाला भिडणार

News Desk

सरकार आता रिलायन्स, रामदेव बाबा यांच्या दुधाची वाट पाहतेय का? 

News Desk

1 नोव्हेंबरपासून यंदाचा उस गाळप हंगाम

News Desk