HW News Marathi
महाराष्ट्र

सनातन संस्थांवर बंदी घाला, अशोक चव्हाण यांची मागणी

मुंबई | दहशतवादी विरोधी पथकाने नालासोपाऱ्यातील सनातन संस्थेच्या तीन सदस्यांना अटक केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली होती.

दहशतवादी विरोधी पथकाने नालासोपारा येथून २० बॉम्ब तसेच काही स्फोटके जप्त केली आहेत. नालासोपाऱ्यातून वैभव राऊत तर शरद काळसकर आणि गोंधळेकर या दोघांना वसईतून अटक केले आहे. स्वातंत्र्य दिवस, ईद, गणपती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. या सणांमध्ये अनुचित घडविणे यामागचे षडयंत्र असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. तस भाजप सरकार सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणीवर गंभीर नसल्याचे चव्हाण यांनी बोलून दाखविले.

सरकारी वकीलांकडून न्यायालयात याप्रकरणी मोठा गौप्यस्फोट करण्यात आला असून आरोपींकडून ८ नाही तर २० बॉम्ब जप्त करण्यात आल्याची माहिती वकीलांनी दिली आहे. तसेच ५० बॉम्ब बनू शकतील इतके साहित्यही जप्त करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्याच्या प्रकरणावर २७ ऑक्टोबरला होणार सुनावणी

News Desk

राणा दाम्पत्यांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, संजय पांडेंची केली तक्रार

Aprna

पुढील दोन वर्षात साडेतीनलाख हेक्टर उस क्षेत्र येणार सूक्ष्म सिंचनाखाली

News Desk