HW News Marathi
कृषी

कृषी विद्यापीठांमध्ये नॅनो टेक्नॉलॉजी विभाग सुरू होणार

पुणे | महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांमध्ये अतिसूक्ष्म म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने कोणतेही संशोधन होत नसल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आधुनिक संशोधन व शिफारशी देण्यासाठी अडथळे येत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील चारही विद्यापीठांमध्ये नॅनो टेक्नॉलॉजी विभाग सुरु करण्यात येणार आहे. कृषी संशोधन प्रकल्पांमध्ये नॅनो तंत्रज्ञान वापरण्यात आलेले नाही. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन संस्थांमधील तंत्रज्ञानाच्या बाबतीत पिछाडीवर असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.

नॅनोमीटर म्हणजे एका मीटरचा शंभर कोटीवा भाग समजला जातो. नॅनो टेक्नॉलॉजी विभाग सुरू झाल्यास अतिसूक्ष्म अवस्थेची रचना माहिती होईल. जैवतंत्रज्ञानाप्रमाणेच कृषी विद्यापीठांचे नॅनो तंत्रज्ञानाकडेही दुर्लक्ष झाले आहे. नॅनो टेक्नॉलॉजी विभाग सुरू करण्याबाबत यापूर्वीही चर्चा झाली होती. महाराष्ट्रातील चारही विद्यापीठांमध्ये हा विभगा स्थापन करण्याबाबत एकमत असून सुद्धा आर्थिक तरतूद झालेली नाही. नॅनो टेक्नॉलॉजी खर्चिक असल्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठांनी एकत्र येऊन एकच आत्याधुनिक प्रयोगशाळा उभारवी काय याचीही चाचपणी करावी लागणार असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

झेंडुच्या शेतीमुळे शेतकऱ्यांना दसरा पावला

News Desk

स्वाभिमानीचे आंदोलन मागे, दुधाला मिळणार २५ रुपये दर

News Desk

दुर्गम भागात रस्त्यांवरही होत आहे भाजीविक्री

News Desk