HW News Marathi
कृषी

कृषी विद्यापीठांमध्ये नॅनो टेक्नॉलॉजी विभाग सुरू होणार

पुणे | महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांमध्ये अतिसूक्ष्म म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने कोणतेही संशोधन होत नसल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आधुनिक संशोधन व शिफारशी देण्यासाठी अडथळे येत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील चारही विद्यापीठांमध्ये नॅनो टेक्नॉलॉजी विभाग सुरु करण्यात येणार आहे. कृषी संशोधन प्रकल्पांमध्ये नॅनो तंत्रज्ञान वापरण्यात आलेले नाही. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन संस्थांमधील तंत्रज्ञानाच्या बाबतीत पिछाडीवर असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.

नॅनोमीटर म्हणजे एका मीटरचा शंभर कोटीवा भाग समजला जातो. नॅनो टेक्नॉलॉजी विभाग सुरू झाल्यास अतिसूक्ष्म अवस्थेची रचना माहिती होईल. जैवतंत्रज्ञानाप्रमाणेच कृषी विद्यापीठांचे नॅनो तंत्रज्ञानाकडेही दुर्लक्ष झाले आहे. नॅनो टेक्नॉलॉजी विभाग सुरू करण्याबाबत यापूर्वीही चर्चा झाली होती. महाराष्ट्रातील चारही विद्यापीठांमध्ये हा विभगा स्थापन करण्याबाबत एकमत असून सुद्धा आर्थिक तरतूद झालेली नाही. नॅनो टेक्नॉलॉजी खर्चिक असल्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठांनी एकत्र येऊन एकच आत्याधुनिक प्रयोगशाळा उभारवी काय याचीही चाचपणी करावी लागणार असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आश्चर्य…शेळीने दिला आठ पायाच्या पिलाला जन्म

News Desk

1 नोव्हेंबरपासून यंदाचा उस गाळप हंगाम

News Desk

केन हार्व्हेस्टरला मोठी मागणी

News Desk
राजकारण

मोदींच्या सुरक्षेत वाढ, अज्ञाताकडून हल्ल्याची शक्यता

swarit

मुंबई | काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कथित कट उघड झाल्याच्या दाव्यानंतर गृह मंत्रालयाने पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबतचे नवे दिशानिर्देश जारी केली आहेत. त्यानुसार, यापुढे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपद्वारे (SPG) परवानगी मिळाल्याशिवाय कोणत्याही मंत्र्याला, तसेच अधिकाऱ्यालाही पंतप्रधान मोदींच्या जवळ येता येणार नाही, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदींच्या जीवाला कधी नव्हे इतका आता धोका निर्माण झाला असून २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना सुरक्षेची सर्वाधिक गरज आहे असे गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

गृह मंत्रालयाने आपल्या परिपत्रकात मोदी यांना ‘अज्ञात धोका‘ असल्याचे म्हटले आहे. एसपीजीने सुरक्षेच्या कारणावरून मोदींना २०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी रोड शो कमी करून सभांवर अधिक भर देण्याचा सल्ला दिला आहे. रोड शोमध्ये सुरक्षेची व्यवस्था करणे कठीण असते, तर तुलनेने सभांसाठीचे नियोजन करणे सोपे असते, असे एसपीजीचे म्हणणे आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबतच्या क्लोज प्रोटेक्शन टीमला (सीपीटी) या नव्या नियमांबाबत माहिती देण्यात आली आहे. सीपीटीला संभाव्या धोक्याबाबत सावध करण्यात आले आहे. गरज भासल्यास मंत्री आणि अधिकाऱ्यांची देखील वेळोवेळी तपासणी करण्यात यावी, अशा सूचनाही सीपीटीला देण्यात आल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच प्रतिबंधित सीपीआयशी (माओवादी) कथित संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ५ जणांपैकी एकाच्या दिल्लीतील निवासस्थानी एक पत्र मिळाले होते. त्यात राजीव गांधी यांच्या प्रमाणेच नरेंद्र मोदी यांच्या हत्येबाबत चर्चा करण्या आली होती.

पंतप्रधान पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना एक व्यक्ती त्यांच्या पाया पडण्यासाठी सरक्षेच्या ७ कड्या तोडून त्यांच्यापर्यंत पोहोचला होता. या घटनेनंतर गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या समीक्षेसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा, गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख राजीव यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत गृहमंत्र्यांनी पंतप्रधानाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना केल्या.

संबंधित अधिकाऱ्याने याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, गृह मंत्रालयाने छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालसारख्या माओवाद प्रभावित राज्यांना संवेदनशील घोषित केले आहे. या राज्यात पंतप्रधान दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्याच्या सूचना गृहमंत्रालयाने केल्या आहेत. सुरक्षा यंत्रणा केरळमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर विशेष लक्ष ठेवून आहेत, असे म्हटले जात आहे. ही संघटना कट्टरतावादी संघटनामधील प्रमुख संघटना असल्याचे मानले जाते.

Related posts

शरद पवार देणार तिवरे गावाला भेट

News Desk

लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले, आजपासून देशभरात आचारसंहिता लागू

News Desk

महाराष्ट्र आपली कर्मभूमी म्हणविणारे बाॅलीवूड कलाकार आता आहेत कुठे ?

News Desk