HW News Marathi
कृषी

मराठवाड्यात बळीराजा पावसाचा प्रतिक्षेत

औरंगाबाद | संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु वरुणराजा मात्र मराठवाड्यावर नाराज असल्याचे चित्र दिसत आहे. मराठवाड्यातील ४२१ मंडळाने पावसाची दिलेल्या आकडेवारीनुसार त्याची अनियमिता दाखवली आहे. काही भागातील शेतकऱ्यांनी पेरणी केली आहेत. परंतु पावसाच्या आभावामुळे शेतकऱ्यांचे पीक धोक्यात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

तसेच जालना जिल्ह्यातील रामनगर, मिरखेडा, भोजपूरी, हडप सावरगाव, भीलपूरी आदी गावशिवारात पावसाने दाडी मारली असल्याची माहिती या भागातील शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे या भागातील पेरण्या खोळंबल्या आहेत. तर मराठवाड्यातील ४२१ मंडळापैकी ८ आठ मंडळांत केवळ दोन दिवस पाऊस पडला. अपेक्षित पावसाच्या तुलनेत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना केवळ पावसाची प्रतिक्षा करावी लागणार की निसर्गाच्या कृपेने पावसाचे लवकर आगमन होणार हे पाहाणे येत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नांदेड जिल्ह्यातील विविध पाणी पुरवठा प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतून ई-भुमिपुजन संपन्न

News Desk

कै.वसंतराव नाईक जयंतीच्या दिवशी कृषी दिन साजरा करण्यात आला.

News Desk

माझं मत-तुमच्या शहरातील एटीएममध्ये पैसे आहेत का?

News Desk
महाराष्ट्र

मराठा आरक्षणावरुन हायकोर्टाचे राज्यसरकारला खडे बोल

News Desk

मुंबई | मराठा आरक्षणाचा निर्णय गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचे काय झाले ? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला होता. यासंदर्भात न्यायालयाने राज्य सरकारला मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी शुक्रवारपर्यंतची संधी दिली होती. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आज मुंबई उच्च न्यायालयात राज्यसरकारकडून आपली बाजू मांडली गेली त्यावेळी राज्यसरकारने आयोगाला सप्टेंबर अखेर पर्यंतचा अवधी वाढवून देण्यात यावा अशी मागणी केली आहे. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने सरकारच्या या मागणीला स्पष्ट नकार दिला असून जुलै अखेर पर्यंतचा अवधी दिला आहे.

मराठा आरक्षणासंदर्भातला निकाल जवळपास गेल्या दिड वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे अजून किती अवधी घेणार असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला. यावेळी ३१ जुलै पर्यंत आयोग संपूर्ण आकडेवारी व माहीती जमा करण्याचे काम करेलअशी ग्वाही राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. त्याचबरोबर त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी होणा-या पुढील सुनावणीत आतापर्यंत केलेल्या कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठाने दिले आहेत.

विनोद पाटील यांनी डिसेंबर २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. की, मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापुर्वीच घेण्यात यावा. जेणे करून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा मागास प्रवर्ग आयोगाकडे प्रलंबित आहे. आरक्षणाचे कुठलेही काम दिसत नसल्याने आयोग आणि राज्य सरकारने वेळ मर्यादेच्या आधीच पडताळणी करुन मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यावा असे मुंबई उच्च न्यायालयाने राज्यसरकारला मागील आठवड्यात सुनावणी दरम्यान बजावले होते. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवार मुंबई उच्च न्यायालयात ही सुणावणी झाली.

 

Related posts

मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रात अनेक वर्ष राजकारण केलं, भाजपचा गंभीर आरोप

News Desk

ए.सीचा वापर न करता नैसर्गिक हवा घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

swarit

शरद पवारांच्या ‘त्या’ व्हिडिओवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये ट्विटर युद्ध

Aprna