HW News Marathi
कृषी

मराठवाड्यात बळीराजा पावसाचा प्रतिक्षेत

औरंगाबाद | संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु वरुणराजा मात्र मराठवाड्यावर नाराज असल्याचे चित्र दिसत आहे. मराठवाड्यातील ४२१ मंडळाने पावसाची दिलेल्या आकडेवारीनुसार त्याची अनियमिता दाखवली आहे. काही भागातील शेतकऱ्यांनी पेरणी केली आहेत. परंतु पावसाच्या आभावामुळे शेतकऱ्यांचे पीक धोक्यात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

तसेच जालना जिल्ह्यातील रामनगर, मिरखेडा, भोजपूरी, हडप सावरगाव, भीलपूरी आदी गावशिवारात पावसाने दाडी मारली असल्याची माहिती या भागातील शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे या भागातील पेरण्या खोळंबल्या आहेत. तर मराठवाड्यातील ४२१ मंडळापैकी ८ आठ मंडळांत केवळ दोन दिवस पाऊस पडला. अपेक्षित पावसाच्या तुलनेत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना केवळ पावसाची प्रतिक्षा करावी लागणार की निसर्गाच्या कृपेने पावसाचे लवकर आगमन होणार हे पाहाणे येत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भारतात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर

News Desk

सरकार आता रिलायन्स, रामदेव बाबा यांच्या दुधाची वाट पाहतेय का? 

News Desk

बोंड अळी प्रादुर्भावामुळे तीन कंपन्यांवर गुन्हा दाखल

News Desk
मुंबई

भारतीय लष्करावर पादचारी पुल बांधण्याची वेळ !

News Desk

– मुंबईतल्या तीन रेल्वे स्थानकांत उभारणार पादचारी पुल

मुंबई – एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वे प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे. म्हणून त्यांनी तीन स्थानकांवर तीन नवे पूल तातडीने उभारण्याचा निर्णय़ घेतला आहे. विशेष म्हणजे हे पुल बांधण्याचे काम आपल्या पराक्रमाने जगामध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या भारतीय लष्कराला देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. याचा अर्थ पूल बांधण्यासाठी रेल्वे प्रशासन नक्कीच सक्षम नाही. ते हतबल आहेत अशी चर्चा सुरू आहे. या बाबत रेल्वे मंत्र्यांना विचारलं असता हे पुल तातडीने पूर्ण व्हावेत त्याचे काम युद्ध पातळीवर व्हावे म्हणून लष्कराला पाचारण करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. एल्फिन्स्टन रोड, करी रोड आणि आंबिवली या तीन स्थानकांवर नवे पादचारी पूल उभे करण्याची घोषणा आज रेल्वेमंत्री पियुष गोयल, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या तीनही पुलांचं काम ३१ जानेवारी २०१८ च्या आत करण्याचं उद्दीष्ठ लष्करानं ठेवलं आहे. दरम्यान एल्फिन्स्टन येथील पादचारी पूल बांधण्याचं काम ५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. पुलासाठी आवश्यक सामुग्री तयार केल्यानंतर ३१ डिसेंबर रोजी या पुलाची पायाभरणी केली जाईल. पुढच्या १५ दिवसांत – म्हणजेच १५ जानेवारीपर्यंत हा पूल बांधून तयार होईल आणि ३१ जानेवारीपर्यंत उर्वरित सर्व छोटी-मोठी कामं संपवून तो प्रवाशांसाठी खुला होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यावेळी दिली.

Related posts

16 वर्षाच्या मुलाने केला ११ वर्षाच्या मुलावर बलात्कार

News Desk

गॅस सिलेंडर २ रुपयांनी महागला

swarit

नालासोपारा स्फोटक प्रकरणात गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपींचा समावेश

Gauri Tilekar