HW News Marathi
कृषी

रब्बीच्या क्षेत्रात विक्रमी वाढ

मुंबई- राज्यात यंदाच्या झालेल्या समाधानकारक पावसामुळे रब्बीच्या क्षेत्रात विक्रमी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. यंदा रब्बीच्या क्षेत्रात तब्बल चार लाख हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे.केंद्रीय कृषी मंत्रालयाने विविध राज्यांच्या रब्बी नियोजनाची माहिती घेतली आहे.

महाराष्ट्रत मात्र रब्बी ज्वारी आणि गव्हापेक्षा जास्त भर हरभरा क्षेत्र वाढविण्याकडे राहणार आहे. खरिपाखालील एकूण क्षेत्र देखील दुबार पिकांकडे जास्तीत जास्त वळविण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात सध्या दुबार पेरणीखालील क्षेत्र ५५ लाख हेक्टरच्या आसपास आहे. यंदाचा चांगला पाऊस झाल्यामुळे या क्षेत्रात किमान ५९ लाख हेक्टरपर्यंत वाढ करण्याचे नियोजन आहे. त्यात मुख्यत्वे हरभरा आणि त्यानंतर गहू व ज्वारीचा समावेश आहे.

उत्तर भारतातील गहू उत्पादक राज्यांमध्ये रब्बी हंगामाची जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात गव्हाऐवजी हरभरा उत्पादनावर भर दिला जाणार आहे, असे दिल्लीतील बैठकीतून परतलेल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

GST लागू झाल्याने 1 जुलै पासून सायनिक खताच्या किंमती कमी       

News Desk

”पेसा”मुळे सौरऊर्जेने ठाणपाड्यात पाणी

News Desk

‘कोकण कपिला’ नावाने होणार कोकणातील देशी गायींची नोंदणी

News Desk
महाराष्ट्र

ज्येष्ठ पत्रकार अरूण साधू कालवश

News Desk

मुंबईः ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि पत्रकार अरुण साधू यांचे सोमवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. वयोमानामुळे गेल्या काही दिवसांपासून साधू यांची प्रकृती खालावली होती. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्रास वाढत गेल्याने काल सकाळी त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान अखेर आज पहाटे साडेचार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. साधू यांचे पार्थिव वांद्रा येथील त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार असून तिथेच अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्यानुसार पुढील सोपस्कार पार पाडले जाणार आहेत. साधू यांच्या निधनामुळे पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील एक मोठे नाव काळाच्या पडद्याआड गेले आहे.

साधू यांनी मराठीत कादंबरी, कथासंग्रह, एकांकिका,नाटक आणि ललित लेखन या विविध साहित्यप्रकारांच्या माध्यमातून लेखन केले. त्यांच्या‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या दोन कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वात लोकप्रिय ठरल्या. यावर आधारित ‘सिंहासन’ हा चित्रपटही अजराअमर ठरला. या सिनेमातील ‘दिगू टिपणीस’ हे अभिनेते निळू फुले यांनी साकारलेले पात्र अरूण साधू यांच्यावरच बेतलेले होते, अशीही चर्चा त्यावेळी झाली. ‘सिंहासन’ या सिनेमात अरूण सरनाईक,श्रीराम लागू, निळू फुले, मधुकर तोरडमल, मोहन आगाशे, दत्ता भट, सतीष दुभाषी, रिमा लागू, लालन सारंग, जयराम हर्डीकर, नाना पाटेकर या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या. मराठी सिनेसृष्टीतला ‘मास्टरपीस’ म्हणून या सिनेमाकडे आजही पाहिले जाते

 

Related posts

आरक्षणाचा अधिकार राज्यांना दिल्यानंतर खासदार संभाजीराजेंची भूमिका!

News Desk

नाथाभाऊंना राजकारण नीट समजतं –  देवेंद्र फडणवीस

News Desk

राज्यात २०२० मध्ये १ लाख ९९ हजार बेरोजगारांना रोजगार-नवाब मलिक

News Desk