HW News Marathi
क्राइम

जन्मदात्या आईनेच 21 दिवसाच्या मुलीची केली हत्या

  • मुंबई जन्मदात्या आईनेच २१ दिवसाच्या मुलीची हत्या केल्याची मन हेलावणारी घटना पवईत घडली. शवविच्छेदनाच्या अहवालात तिची हत्या झाल्याचे स्पष्ट होताच शुक्रवारी पवई पोलिसांनी आईला बेड्या ठोकल्या आहेत. मीना जयस्वाल (२३) असे आईचे नाव आहे.पवई येथील मिलिंद नगर परिसरात मीना जयस्वाल पत्नी आणि मुलीसोबत राहत होती. तिच्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत. पती गारमेंटमध्ये कामाला आहे, तर ती गहिणी आहे. पहिली मुलगी झाली म्हणून ती नाराज होती. अशात दुसऱ्या वेळी तरी वंशाचा दिवा म्हणून मुलगा व्हावा अशी अपेक्षा तिला होती. आणि मुलगाच होणार या आनंदात असताना दुसरीही मुलगी झाली. तिचा जन्म झाल्यापासून तिने तिच्याकडे दुर्लक्ष केले. ७ तारखेला ती २१ दिवसाची पूर्ण झाली. पती कामावर गेल्याने तिने तिच्या हत्येचा डाव रचला. मीनाने २१ दिवसाच्या मुलीचे नाक तोंड दाबून जमिनीवर डोके आपटून तिची हत्या केली. मुलीचा मृत्यू झाल्याचे समजताच ती शांत झाली.

    त्यानंतर अटकेच्या भितीने तिने मुलगी खाटेवरुन पडून जखमी झाल्याचे सांगून तिला राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूृवीच तिला मत घोषित करण्यात आले. मुलीच्या शवविच्छेदनाच्या अहवालानुसार तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार शुक्रवारी पवई पोलिसांनी मीनाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन तिला अटक केली. तिच्या चौकशीत वरील बाब उघड झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक बी. के. महाडेश्वर यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बुलढाणा : शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्यास अटक, उकीरड्यात पुरलेले 42 लाख जप्त

Manasi Devkar

बाप-लेकीचा शोध घेताना दुसऱ्या खूनाच उलगडा

News Desk

अल्पवयीन तरुणीने प्रियकराच्या सहाय्याने स्वतःच्याच घरी केली दागिन्यांची चोरी

News Desk
देश / विदेश

बिहारमध्ये राजकीय भूकंप

News Desk

नवी दिल्ली: बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. जेडीयूच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजीनामा दिला आहे. राज्यपाल के. एन. त्रिपाठी यांची भेट घेऊन त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. इतकेच नाही तर मोदींनी त्यांना भाजपमध्ये येण्याची आॅफरही दिली आहे. भ्रष्टाचाराशी आपण एकत्र लढू असेही मोदींनी म्हटले आहे.

तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपद न सोडण्यावर ठाम आहेत. आरोप असलेल्या मंत्र्यांसोबत काम करणे अशक्य असल्याचे नितिशकुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले आहे. बिहारच्या हितासाठी आपण काहीही करायला तयार आहे.

बिहारमधील जेडीयू-आरजेडी-काँग्रेस महायुती अवघ्या २० महिन्यांत तुटली आहे. लालू प्रसाद यादव यांनी ही चर्चा वायफळ असल्याचे म्हटले होते. महाआघाडी तुटण्याचा प्रश्नच नसल्याचे ते म्हणाले होते.

‘नितीशकुमारांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तेजस्वी यादव यांचा राजीनामा मागितलेला नाही. या प्रकरणात मीडियालाच अधिक स्वारस्य आहे. नितीशकुमार आमचे नेते आहेत. ‘महाआघाडीत फूट’ या मीडियातून पसरवल्या जाणाºया अफवा आहेत.’, असे लालूंनी काही वेळेपूर्वी म्हटले होते.

राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर लालू यादव म्हणाले, ‘बिहार सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. महाआघाडीत काहीही चलबिचल नाही. सगळ्या मीडियाच्या अफवा आहेत. नितीशकुमारांनी तेजस्वींचा राजीनामा मागितलेला नाही.’ तेजस्वी यादवही म्हणाले की मला कधीही राजीनामा मागितला गेला नाही. नितीशकुमारांनीही आज आमदारांची बैठक बोलावली आहे. लालू यादव व त्यांच्या कुटुंबावर रेल्वे निविदा घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तेजस्वी यादवांच्या राजीनाम्याची भाजपने मागणी केली होती. जेडीयूचे म्हणणे होते की तेजस्वी यांनी जनतेसमोर स्पष्टीकरण द्यावे.

Related posts

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर 2 आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

Aprna

अटकपूर्व जामीन हवा असेल तर, केरळ पूरग्रस्तांना मदत करा | न्यायालय

swarit

पंतप्रधान मोदींनी घेतली चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

News Desk