HW News Marathi
क्राइम

पुढच्या २ वर्षांमध्ये ठेवीदारांचे सर्व पैसे परत करू शकेन ! 

पुणे । माझ्या हातात असलेले प्रकल्प पूर्ण करून पुढच्या दोन वर्षांमध्ये ठेवीदारांचे सर्व पैसे परत करून देखील माझ्याकडे काही रक्कम शिल्लक राहील, असा दावा माहिती बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी सोमवारी (११ फेब्रुवारी) न्यायालयात केला. दरम्यान, विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जी व्यक्ती २०१४ ते २०१७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करू शकली नाही, ती व्यक्ती पुढच्या दोन वर्षात हे प्रकल्प कसे पूर्ण करणार ?, असा सवाल प्रवीण चव्हाण यांनी उपस्थित केला.

म्हाडासोबतचे अनेक प्रकल्प पूर्ण करण्यात आले असून ठेवीदारांचे ५०१ कोटी रुपये देणे सहज शक्य असल्याचे डीएसके यांनी न्यायालयात सांगितले. चव्हाण यांनी मात्र याला विरोध करत डीएसके न्यायालयाची दिशाभूल करत असल्याचे म्हटले आहे. आजपर्यंत ठेवीदारांचे तब्बल १ हजार २८६ कोटी बँकांचे १ हजार ६५० कोटी, तर एमसीडीचे १३५ कोटी रुपये देणे बाकी आहेत. असे असताना डीएसके प्रकल्पासाठी पैसे कुठून आणणार, असा प्रश्न चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्यातील कार अपघातात पुण्यातील एक ठार

News Desk

गोलंदाज बाद होतात तेव्हा, एकाच्या घरी चोरी, एकाच्या घरावर हल्ला

News Desk

‘महाराष्ट्रातील लोक तंबाखू समजून गांजा तर खात नसतील?’- नवाब मलिक झाले ट्रोल

News Desk