HW News Marathi
क्राइम

गोखले पूल दुर्घटनेच्या १६ तासानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत

मुंबई | गोखले पूल दुर्घटनेनंतर तब्बल १६ तासानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली आहे. अंधेरी स्टेशन जवळील गोखले पुलाचा काही भाग मंगळवारी सकाळी साडेसात वाजता कोसळला. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या दुर्घटनेत पाज जखमी झाले आहेत.

मंगळवारी रात्री आठ वाजता पश्चिम रेल्वेने अंधेरीहून चर्चगेटच्या दिशेने ट्रायल लोकल सोडण्यात आली होती. यानंतर ८ वाजून २३ मिनिटांने चर्चगेटच्या दिशेने जलग मार्गावरील वाहतूक सुरू झाली. मध्यरात्री एक वाजता चर्चगेटच्या दिशेने धीम्या मार्गावरील वाहतूक सेवा सुरळीत झाली.

परंतु गोखले पूल दुरुस्तीसाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. जोगेश्वरीचा बाळासाहेब ठाकरे पूल,सांताक्रझूचा मिलन फ्याओव्हर, मालाड-गोरेगावचा मृणालताई गोरे फ्याओव्हर, विलेपार्लेचा कॅप्टन गोरे पूल आणि अंधेरी-खारचा मिलन सबवे या नागरिकांना पर्यांयी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

खासगी क्लास शिकवणे पडले महागात

News Desk

11 कोटींचे डिल ठरले, 40 लाखांची लाचेची रक्कम स्वीकारून तो आला कॅमेरासमोर

News Desk

उमरीमध्ये 9 लाखाच्या गुटख्यासह दोघांना केले अटक 

News Desk