HW News Marathi
मनोरंजन

#IndianNavyDay : … म्हणून साजरा केला जातो ‘नौदल दिन’

भारतीय नौदलाला १९३४ मध्ये ब्रिटीशांनी स्थापन केलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) या सेनेपासून सुरूवात झाली. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजय मिळविणे भारताला अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला. या दिवसाला ‘नौदल दिन’ म्हणून संबोधले जाते. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून करण्यात येते.

४ डिसेंबर इंडियन नेव्ही डे म्हणजे भारतीय नौदल दिन म्हणून ओळखला जातो. १९७१ साली भारताच्या नौदलानं पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात कराची बंदरावर हल्ला करण्यात, विशाखापट्टणमवरचा हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. या कामगिरीचं नाव होतं ऑपरेशन ट्रायडण्ट. ४ डिसेंबरला ही कामगिरी यशस्वी झाली. या कामगिरीला सलाम म्हणून भारतीय नौसेना नेव्ही डे साजरा करते.

भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौकांच्या ताफा आहे. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. २०० मरीन कमांडों नौदलात आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन; रंगभूमीवरचा हसरा चेहरा हरपला!

Aprna

सिध्दार्थ जाधवने केली बीडच्या ८५ अनाथ मुलांना मदत

News Desk

“आर्यन खाननं कोणतंही ड्रग्ज घेतलं नाही!”, हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण

News Desk
मनोरंजन

#IndianNavyDay : पाकिस्तानचा पराभव आणि नौदल दिन

News Desk

देशाला मजबूत करण्यासाठी भारतीय नौदलाची विशेष भूमिका आहे. ४ डिसेंबर रोजी नेव्ही डे साजरा केला जातो. १९७१ च्या युद्धाच्या वेळी भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलावर केलेल्या जोरदार हल्ल्यामुळे हा दिवस खास मानला जातो. सध्या भारतीय नौदलाला जगातील पाचव्या क्रमांकाचे मोठे सैन्य म्हणून पाहिले जाते. या विशेष दिवशी भारतीय सैन्याची ही खासियत जाणून घ्या आणि भारतीय नौदल पाकीस्तानच्या तुलनेत किती शक्तीशाली आहे हे वाचा सविस्तर …

भारतीय नौसेना नामकरण

इतिहास पाहिला तर भारतीय नौदलाची सुरुवात १६१२ मध्ये झाल्याचे लक्षात येते. इंग्रजांनी त्यांच्या जहाजाच्या संरक्षणासाठी कंपनी मरीन म्हणून सैन्याची तुकडी तयार केली होती. नंतर नामांतर करुन रॉयल इंडियन नेव्ही असे या तुकडीचे नाव ठेवण्यात आले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर रॉयल इंडियन नेव्हीची २६ जानेवारी १९५० ला पुनर्चना करण्यात आली. त्यानंतर भारतीय नौसेना असे नामकरण करण्यात आले.

पाकिस्तानचा पराभव

४ डिसेंबर १९७१ पासून भारतीय नौदल दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, भारतीय नौदलाने ऑपरेशन ट्रॉइडेंट लॉन्च करुन पाकिस्तानच्या कराची हार्बरचा नाश केला. हे पाकिस्तान नेव्हीचे मुख्यालय होते. अशा प्रकारे भारतीय नौदलाच्या या हल्ल्याने पाकिस्तान सैन्य कमकुवत झाले आणि हे युद्ध हरले.

भारतीय नौदल प्रचंड शक्तिशाली

भारतीय नौदलाला जगातील पाचव्या क्रमांकाचे मोठे नौसेना मानले जाते. सध्या ७८,००० पेक्षा जास्त सैनिक आहेत. विशेष गोष्ट अशी आहे की आजही ब-याच वर्षांनंतर भारतीय नौसेनाकडे पाकिस्तानच्या नेव्हीवर दबाव निर्माण करण्याची क्षमता आहे. भारतीयनौदल काही मिनिटांत पाकिस्तानच्या नौदलाचा करू शकते. पाकिस्तानी पेक्षा भारतीय नौदल अधिक शक्तिशाली आहे.

भारतीय नौसेना

प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार भारतीय नौदलात २९५ जहाजे आहेत. विमान वाहक ३ जहाजे, युद्ध जहाजे १४, विध्वंसक ११, लढाऊ जल जहाजे २३, पानबुडी १५, पेट्रोल क्राफ्ट १३९ आणि युद्ध नौका 6 आहेत.

 

Related posts

..तर संजय दत्त पुन्हा जेलमध्ये

News Desk

अभिनेत्री सोनाली बेंद्रे मायदेशी परतली

News Desk

पंडीत तुळशीदास बोरकर यांच्या निधनाने संगीतातला एक स्वर निखळला | विनोद तावडे

News Desk