HW News Marathi
राजकारण

चिमुकल्या विद्यार्थ्यांची सामाजिक दिवाळी

मुंबई | आपल्याकडे अनेक आदिवासी भागांत आजही दिवाळी साजरी होत नाही हे लक्षात घेऊन कल्याण येथील प्राथमिक विद्यामंदिर कर्णिक रोड शाळेतील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. या विद्यार्थ्यांनी विविध आकाराचे कंदील आणि आकर्षक पणत्या रंगविल्या आहेत. टिटवाळा येथील दहिवली या आदिवासी पाड्यावर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या सर्व साहित्याचे वाटप आले आहे. विशेष बाब म्हणजे या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपासून आपापल्यापरीने घरातून धान्य गोळा करून आणले होते. विद्यार्थ्यांनी गोळा केलेले तांदुळ, गहू, डाळ देखील त्यांनी या पाड्यावर वाटले.

“गेल्या चार वर्षांपासून आमची शाळा दिवाळीनिमित्त असा उपक्रम करत आहे. यापुढे देखील असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवण्याचा आमचा प्रयत्न राहील”, असे प्राथमिक विद्यामंदिर कर्णिक रोड शाळेच्या मुख्याध्यापिका भारती वेदपाठक यांनी सांगितले. या उपक्रमास शाळेतील अनेक माजी विद्यार्थी आणि पालकांनी देखील मोठी मदत केली. ‘टीम परिवर्तन’च्या मदतीने आदिवासी पाड्यावर गेल्या काही काळापासून सातत्याने विविध मोहीम राबविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

युतीच्या घोषणेपूर्वीच शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप

News Desk

‘ठग ऑफ महाराष्ट्र’ पोस्टरमधून विरोधकांकडून सरकारवर टीका

News Desk

ईशान्य मुंबईचे दोन्ही उमेदवार कोटक, संजय दीना पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

News Desk
राजकारण

विधानभवनावर पोहचण्याआधीच ओला-उबर चालकांना पोलिसांनी रोखले

News Desk

मुंबई | विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला आज (१९ नोव्हेंबर)ला सुरुवात झाली आहे. ओला-उबर चालक आपल्या मागण्यांसाठी विधानभवनावर धडक देणार होते. परंतु ओला-उबर चालक विधानभवनावर पोहचण्याआधीच भारतमाता सिनेमागृहाजवळ पोलिसांनी त्यांना रोखले. चालक त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी करी रोडच्या भारतमाता चौकापासून ते विधानभवनापर्यंत मोर्च्या काढण्यासाठी मोठ्या संख्येने हजर झाले होते.

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कर्मचारी संघाकडून ओला-उबर चालक मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. शनिवारी रात्रीपासून अनेक ओला-उबर चालक संपावर गेले आहे. या चालक प्रतिकिमी प्रतिकिमी भाडे १८ रुपयांवरून २३ रुपये करण्यात यावे, कमीतकमी अंतरांसाठी नीच्चतम भाडे १५० रुपयांवरून १८० रुपये करण्यात यावे अशा मागण्यांसाठी ओला-उबर कर्मचारी संपावर गेले आहेत.

कल्याण,ठाणे,नवी मुंबईतील अनेक चालकही या मोर्च्यात आज सहभागी होण्यासाठी भारतमाता चौकात जमले होते. हजारोंच्या संख्येने ओला चालक मोर्चा काढणार असल्यामुळे वाहतूक कोंडी होईल अशी भीती वर्तवण्यात येत होती. त्यामुळे मुंबईत सुरक्षच्या दृष्टीने हा मोर्चा सुरू होण्याआधीच तो पोलिसांनी अडवला आहे.

Related posts

काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपत प्रवेश

swarit

राजस्थानमध्ये जागावाटपावरून गेहलोत-पायलट समोरासमोर

News Desk

आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी नागरिक सजग, ३ हजार २११ तक्रारी दाखल

News Desk