HW News Marathi
राजकारण

चिमुकल्या विद्यार्थ्यांची सामाजिक दिवाळी

मुंबई | आपल्याकडे अनेक आदिवासी भागांत आजही दिवाळी साजरी होत नाही हे लक्षात घेऊन कल्याण येथील प्राथमिक विद्यामंदिर कर्णिक रोड शाळेतील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. या विद्यार्थ्यांनी विविध आकाराचे कंदील आणि आकर्षक पणत्या रंगविल्या आहेत. टिटवाळा येथील दहिवली या आदिवासी पाड्यावर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या सर्व साहित्याचे वाटप आले आहे. विशेष बाब म्हणजे या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपासून आपापल्यापरीने घरातून धान्य गोळा करून आणले होते. विद्यार्थ्यांनी गोळा केलेले तांदुळ, गहू, डाळ देखील त्यांनी या पाड्यावर वाटले.

“गेल्या चार वर्षांपासून आमची शाळा दिवाळीनिमित्त असा उपक्रम करत आहे. यापुढे देखील असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवण्याचा आमचा प्रयत्न राहील”, असे प्राथमिक विद्यामंदिर कर्णिक रोड शाळेच्या मुख्याध्यापिका भारती वेदपाठक यांनी सांगितले. या उपक्रमास शाळेतील अनेक माजी विद्यार्थी आणि पालकांनी देखील मोठी मदत केली. ‘टीम परिवर्तन’च्या मदतीने आदिवासी पाड्यावर गेल्या काही काळापासून सातत्याने विविध मोहीम राबविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

डॉ राजेश देशमुख पुण्याचे नवे जिल्हाधिकारी

swarit

“…मग दोन पक्षांतर करणाऱ्यांचे जुळाले असेल”, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Aprna

मी धर्माच्या किंवा जातीच्याआधारावर निवडणूक लढविणार नाही !

News Desk
मुंबई

मोनोरेलच्या आगीवर नियंत्रण

News Desk

मुंबई म्हैसूर कॉलनी मोनोेरेल स्टेशनजवळ मोनोरेलच्या शेवटच्या दोन डब्यांना आग लागली. या दुर्घटनेत मोनोचे दोन्ही डबे जळून खाक झाले आहेत. या घटनेते कोणतीही जीवितहानी झालेली नाही.आज पहाटे स्टेशनवर मोनोरेल उभी असताना अचानक आग लागली. आग लागल्यामुळे मोनोरेलची वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. यामुळे ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गुरुवारी पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाला तातडीनं याची माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलानं आग विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Related posts

आदित्य ठाकरेंनी मुंबईतील वायू प्रदूषणासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांना लिहिले पत्र; म्हणाले…

Aprna

रेल्वेच्या निषेधार्थ उपोषण

News Desk

डहाणूत ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली

News Desk