HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदी यंदा हर्षिल सीमेवर साजरी करणार दिवाळी

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांची यंदाची दिवाळी देखील सैनिकांसोबतच साजरी करणार आहेत. पंतप्रधान मोदी यंदा उत्तराखंडातील हर्षिल सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यावेळी मोदींसोबत लष्कर प्रमुख बिपिन रावत आणि अन्य सैन्याचे अधिकारी देखील हजर असतील.

हर्षिल सीमा ही भारत-चीन सीमारेषेपासून ४५ किलोमीटर अंतरावर आहे. यानंतर मोदी केदारनाथचेही दर्शन घेणार आहेत. २०१४मध्ये मोदींनी पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतल्यानंततर एलओसीवर जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. त्यानंतर जम्मू-काश्मीरमधी गुरेज सेक्टरमध्ये सीमारेषेजवळ जाऊन त्यांनी बीएसएफच्या जवानांसोबत दिवाळीचा आनंद लुटला होता. तसेच जवानांच्या शौर्यालाही त्यांनी सलाम केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#PulwamaAttack : सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीच गैरहजर | शरद पवार

News Desk

साध्वी प्रज्ञाच्या रोड शोदरम्यान गोंधळ, एनसीपी कार्यकर्त्यांनी दाखविले ‘काळे झेंडे’

News Desk

…म्हणूनच सीबीआयच्या संचालकांना हटविले, राहुल गांधींची मोदींवर टीका

swarit
राजकारण

दिवाळीनंतर मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा आक्रमक

News Desk

मुंबई | मराठा आरक्षणासाठी दिवाळीनंतर सकल मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आंदोलन राज्यव्यापी असल्याची माहिती मंगळवारी सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक निशांत सकपाळ यांनी दिली आहे. सकपाळ यांनी २ नोव्हेंबरपासून आझाद मैदाात क्रांती मोर्चाे बेमुदत उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी युवकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या घरात सरकारविरोधात काळी दिवाळी साजरी होत आहे.

“मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत मागितल्याने, तोपर्यंत बेमुदत उपोषणाद्वारे इतर मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे. गेल्या तीन दिवसांत पाच आंदोलकांना प्रकृती खालावल्याने रुग्णालयात भरती करावे लागले. मात्र, भावना शून्य सरकार मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहात आहे. याचे परिणाम सरकारला दिवाळीनंतर भोगावे लागतील,” असा इशाराही सकपाळ यांनी दिला आहे.

तसेच समन्वयक प्राध्यापक संभाजी पाटील म्हणाले की, सरकारने मराठा समाजातील काही समन्वयकांना हाताशी घेऊन आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरनंतर विविध ठिकाणी आंदोलनांची घोषणा केली जात आहे. मुंबईमध्ये निर्णायक आंदोलन होऊ नये, म्हणून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे हे षडयंत्र आहे. मात्र, आरक्षण आणि इतर मागण्यांची पूर्तता होत नसल्याने, आर्थिक व सामाजिक अडचणीत सापडलेला ग्रामीण भागातील मराठा समाज दिवाळीनंतर मुंबईत एकवटेल. गुराढोरांसह आणि शेती साहित्य घेऊनच १५ नोव्हेंबरनंतर मराठा शेतकरी आणि शेतमजूर मुंबईवर धडक देईल, असे सकल मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केले.

Related posts

विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, राज्यात आजपासून आचारसंहिता लागू

News Desk

राष्ट्रवादीकडून विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार यांची निवड

News Desk

युद्ध नसताना जवान का शहीद होतात !

News Desk