HW News Marathi
शिक्षण

5 मार्चपासून सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षा

मुंबई – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी-बारावीच्या मुख्य लेखी परीक्षा 5 मार्चपासून सुरू होणार आहेत. आज सीबीएसईकडून या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
सीबीएसईच्या दहावीची परीक्षा ही 5 मार्चला सुरू होऊन ती 5 एप्रिलपर्यंत चालेल. या परीक्षेत एकूण 95हुन अधिक विषयांच्या पेपरची परीक्षा होईल.
त्यात मराठी,इंग्रजी, हिंदी, गुजराती,कन्नड, तामिळ, तेलगू आदी भाषांसह फेंच, जर्मन आदी भाषा विषयांच्या पेपरचा समावेश आहे. त्यासोबत सीबीएसईकडून खास शिकवण्यात येणाऱ्या चित्रकला या विषयाचा पेपर अखेरच्या दिवशी ठेवण्यात आला आहे. या परीक्षेला देशभरातून सुमारे 17 लाखांच्या दरम्यान विद्यार्थी बसणार असल्याची माहिती सीबीएसईच्या मुख्य प्रसिद्धी प्रमुख रमा शर्मा यांनी दिली.
सीबीएसईच्या बारावीची परीक्षा ही 5 मार्चलाच सुरू होणार असून ती 12 एप्रिलपर्यंत चालेल यात 169 पेपरची परीक्षा घेतली जाईल. यासंदर्भात मंडळाने आपल्या संकेतस्थळावर सर्व माहिती टाकली असून प्रत्येक परीक्षा केंद्रालाही त्यासाठीची माहिती देण्यात आली असल्याचे शर्मा म्हणाल्या.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई विद्यापीठाचे निकाल पाच दिवसांत लावतो

News Desk

स्कूलबस चालकाचा मुलगा सीएसच्या परीक्षेत अव्वल

News Desk

तुम्हाला झेपत नसेल तर शिकू नका नोकरी करा !

News Desk
राजकारण

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या 24 वर्धापन दिनी रिपाइंतर्फे जाहीर अभिवादन सभा

News Desk

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठनामांतराच्या 24 व्या वर्धापन दिनी रिपब्लिकनपक्षाच्या वतीने जाहीर अभिवादन सभेचेआयोजन दि 14 जानेवारी रोजी सायंकाळी 6वाजता करण्यात आले आहे. ही जाहीर सभा औरंगाबाद मध्ये विद्यापीठाच्या ऐतिहासिककमान असलेल्या प्रवेशद्वाराजवळील डॉ. आंबेडकर कॉमर्स कॉलेजच्या प्रांगणातआयोजित करण्यात आली आहे.

या सभेसरिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले ;राज्याचे सामाजिकन्यायमंत्री राजकुमार बडोले आणि पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर प्रामुख्याने उपस्थितराहणार असल्याची माहिती रिपाइंचे महाराष्ट्रप्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी दिलीआहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडाविद्यापीठाचा नामांतर लढा 17 वर्ष आंबेडकरीजनतेने लढवीला.

प्रचंड संघर्ष आणिअनेकांच्या बलीदानातून नामांतर साकारले.त्याप्रित्यर्थ नामांतर लढ्याचा विजय आणिनामांतर लढ्यातील शाहिदांना अभिवादनकरण्यासाठी मागील 23 वर्ष सातत्याने रिपाइंतर्फे अभिवादन सभा विद्यापीठ प्रवेशद्वाराजवळऔरंगाबाद मध्ये आयोजित केली जाते यंदा याअभिवादन सभेचे हे 24 वे वर्ष असल्याचीमाहिती या सभेचे संयोजक रिपाइं चे राज्यकार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी दिली.

केंद्रीयमंत्री रामदास आठवले याचे मोठे योगदान राहिलेअसून नामांतराचे शिल्पकार म्हणून त्यांनागौरविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभररिपब्लिकन पक्षातर्फे प्रत्येक तालुक्यात ;गावातनामांतर दिन साजरा करण्याचे आवाहन सर्वकार्यकर्त्यांना रिपाइंतर्फे अधिकृतरित्याकरण्यात

Related posts

‘भाईयो और बहनो’, म्हणत राहुल गांधींनी केली पंतप्रधानांची नक्कल

Darrell Miranda

परेश रावल ऐवजी हसमुख पटेल यांना भाजपकडून उमेदवारी

News Desk

हार्दिकच्या टिकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर

News Desk