HW News Marathi
शिक्षण

छात्र भारती आक्रमक, एल्फिन्स्टन कॉलेजवर अॅट्रॉसिटी दाखल करणार  

मुंबई | गेल्या दोन वर्षांपासून मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेज प्रशासनाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरून घेतलेले नाहीत. त्यामुळे शंभराहून अधिक मागासवर्गीय विद्यार्थ्यी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत छात्र भारती विद्यार्थी संघटनेने गुरुवारी राज्य मागासवर्गीय आयोगाकडे धाव घेतली. यावेळी संबंधित महाविद्यालयावर अॅट्रॉसिटी दाखल करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे समाजकल्याण आयुक्तांनी एल्फिन्स्टन कॉलेजला पत्रव्यवहार करूनही महाविद्यालयाने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी २ वर्षांपासून विद्यार्थ्यांना शासकीय लाभापासून वंचित रहावे लागले. सदर प्रकार सामाजिक न्यायाची प्रतारणा करणारा असून राज्यघटनेची पायमल्ली करणारा आहे, असे मत छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी व्यक्त केले.

मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या ज्या ज्या महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती संदर्भात दिरंगाई केली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे छात्र भारतीने गुरुवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अनु. जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष रमेश कांबळे यांना भेटून हे निवेदन देण्यात आले. तसेच आयोगाचे सदस्य थुल यांचीसुद्धा भेट घेतली. या भेटी दरम्यान दोघांनीही सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत महाविद्यालयाकडून, राज्यशासनाकडून व समाजकल्याण विभागाकडून माहिती मागवणार असल्याचे सांगितले. येत्या २५ जुलैला सुनावणी घेणार असल्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले आहे. यावेळी छात्र भारतीचे भगवान बोयाळ, अमर एकाड आणि तुषार पोळ आदी सदस्य उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सिध्दांत आणि व्यवहार’ विषयावर चर्चासत्र

News Desk

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी १० जुलै पर्यंत अर्ज करू शकता

News Desk

महाविद्यालयाच्या उपक्रमातून उद्योजकतेचे धडे, आंबेडकर महाविद्यालयाचा अनोखा कार्यक्रम

News Desk
कृषी

स्वाभिमानीचे आंदोलन मागे, दुधाला मिळणार २५ रुपये दर

News Desk

नागपूर | राज्यात दुधाला प्रति लिटर ५ रुपये प्रमाणे अनुदान मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरु केले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या या तीव्र आंदोलनाला अखेर यश आले आहे. गुरुवारी राज्य सरकारने दुधाला प्रतिलीटर २५ रुपये दर देण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले आंदोलन मागे घेतले आहे. दूध दरवाढीचा हा निर्णय २१ जुलैपासून लागू होणार असून, दूध संघांना आता शेतक-यांना २५ रुपये प्रति लिटर प्रमाणे भाव द्यावा लागणार आहे. गुरुवारी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधान परिषदेत तशी घोषणा देखील केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यात तब्बल ४ दिवस आंदोलन सुरुच ठेवले होते. दरम्यान अनेक ठिकाणी दुधाचे टँकर रोखण्यात आले. मात्र मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये दूधटंचाई जाणवली नव्हती. या पार्श्वभूमीवर ‘स्वाभिमानी’चे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात तातडीची बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आला.

तुर्तास दुधाला दिलेली दर वाढ समाधानकारक आहे . तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलताना मी तीन-चार पर्याय दिले होते. त्यातील एक पर्याय सरकारने आज स्वीकारला आहे. त्यामुळेच आम्ही आंदोलन मागे घेत आहोत अशी प्रतिक्रीया प्रसार माध्यमांशी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.

 

Related posts

शेतकरी मदतीबाबत सरकारने शब्द फिरवल्यास हक्कभंग आणणार ! विखे पाटील

News Desk

साखर उद्योगासाठी केंद्र सरकारकडून ४५०० कोटींचे पॅकेज

swarit

अर्थसंकल्पात शेतकरी हाच केंद्रबिंद

News Desk