HW News Marathi
शिक्षण

तुमच्या पगारापेक्षा बाराशेपट अधिक पगार घेतात सीईओ

वृत्तसंस्था( नवी दिल्ली) – तुम्ही एखाद्या खासगी कंपनीत नोकरी करत असाल आणि तुमचा पगार जर 12 हजार असेल तर त्याच्या बारशे पट तुमच्या सीईओचा पगार असोत. कदाचित आपल्याला हे ऐकून धक्का बसेल परंतु हे सत्य आहे. एका पाहणीत ही बाब लक्षात आली आहे. बड्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि मध्यम स्तरातील कर्मचारी यांच्या वेतनातील तफावत प्रचंड प्रमाणात असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. शेअर बाजारात सुचिबद्ध असलेल्या ब्लू-चिप कंपन्यांच्या सीईओंचे वेतन हे या कंपन्यांच्या मध्यम स्तरीय कर्मचाऱ्यांचे वेतनापेक्षा तब्बल बाराशे पट अधिक असल्याचे या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.

भांडवल बाजार नियंत्रक सेबीच्या आदेशानुसार शेअर बाजारातील आघाडीच्या सूचिबद्ध कंपन्यांनी आपापल्या विविध स्तरांवरील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्याची माहिती दिली. त्यातून वरील बाब स्पष्ट झाली आहे. या माहितीनुसार सीईओ, कार्यकारी अध्यक्ष यांना मिळणारा मोबदला प्रचंड प्रमाणात असून अनेक कंपन्यांनी या दोन्ही पदांचे मानधन २०१६-१७ या मागील आर्थिक वर्षात वाढवलेही आहे. त्या तुलनेत मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्याचे वेतन मागील आर्थिक वर्षात वाढलेले नाही, तर या स्तराच्या तुलनेत सर्वोच्च स्तरावरील व्यक्तींचे वेतन कित्येक पटींनी अधिक आहे. मात्र त्याचवेळी सरकारी कंपन्यांच्या सीईओंचे वेतन हे मध्यम स्तरीय कर्मचाऱ्यांच्या केवळ तीन ते चार पटच अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पुणे येथे १८ एप्रिल रोजी साक्षर भारत प्रेरकांचे राज्यव्यापी भव्य धरणे आंदोलन

News Desk

यशश्रीने गाठले यशशिखर

swarit

जालना येथे सैन्य भरती

News Desk
मुंबई

महाराष्ट्राच्या हितासाठी अंहकार बाजूला ठेवला-उद्धव

News Desk

राज्यात २५ वर्षानंतर युतीची सत्ता आली. महाराष्ट्राचे भलं करण्यासाठी एक प्रयोग म्हणून भाजपसोबत सत्तेत एकत्र आलो, असं सांगतानाच भाजपसोबत कितीही वाद असले तरी अहंकार बाजूला ठेऊन महाराष्ट्राच्या हितासाठीच कमीपणा घेऊन सत्तेत थांबलो, असा खुलासा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’ मध्ये दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल करतानाच सावध पवित्राही घेतला. अडीच वर्षे झालीत. आता पहिला टप्पा कर्जमुक्तीचा आला. त्यानंतर समृद्धी महामार्गाचा आहे. विकासाच्या आड आम्ही आलेलो नाही. परंतु शेतकऱ्यांची राखरांगोळी करून आम्ही समृद्धीचा विकास होऊ देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

केवळ सरकार मदत देतय म्हणून बुलेट ट्रेन करणं योग्य नाही. त्यात पैसाही जातोय आणि नुकसानही होतयं, असं सांगतानाच खरंच मुंबईला बुलेट ट्रेनची गरज आहे काय? मुंबईचे किती लोक अहमदाबादला जाणार आहेत? मुंबईच्या किती लोकांना अहमदाबादला जाण्याची गरज लागते?, असा सवालही त्यांनी केला.

तर एकला चलो रेचा मार्ग कायम

युतीचे संबंध तुटलेले आहेत. ते संबंध पूर्ववत करणे म्हणजे यू-टर्न नाही. आताशी येणे-जाणे सुरू झाले आहे. हे संबंध का बिघडले? कुठे तुटले? यावर मनमोकळी चर्चा झाली तर सुधारणा होईल, अन्यथा ‘एकला चलो रे’चा मार्ग पत्करला आहे, तो तसाच राहिल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना शत्रू? मग चीन आणि पाकिस्तान कोण?

भाजपच्या शिबिरांमध्ये शिवसेना नंबर एकचा शत्रू असल्याचे सांगण्यात येते, त्यावर काय वाटतं, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर शिवसेना शत्रू वाटत असेल तर मग चीन आणि पाकिस्तान कोण? असा सवाल करतानाच शिवसेना नंबर वनचा शत्रू असल्याने त्यांचं चीन आणि पाकिस्तानकडे दुर्लक्ष झालं असावं, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. उद्या जर युद्ध भडकलेच तर हिंदुस्थानची त्याला तयारी आहे काय? असा सवालही त्यांनी केला.

Related posts

मुंबईतलं जिना हाऊस तोडून सांस्कृतिक केंद्र उभारा – आ. लोढा

News Desk

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे सुमारे ६२ टक्के काम पूर्ण; २०२३ अखेर प्रकल्प पूर्ण होईल! – मुख्यमंत्री

Aprna

उत्तरप्रदेश सरकारचे विमान मुंबईत कोसळले

swarit