HW News Marathi
मनोरंजन

‘कलंक’च्या शूटिंगसाठी आलिया-वरुण होणार कारगीलला रवाना

मुंबई | आलिया भट्ट आणि वरुण धवन चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. आलिया आणि वरुणच्या जोडीला नेहमीच पसंती देण्यात आली आहे. स्टुडन्ट ऑफ दि इयर, हम्प्टी शर्मा कि दुल्हनिया आणि बद्रीनाथ कि दुल्हनिया नंतर आलिया आणि वरुण करण जोहरच्या कलंक या आगामी चित्रपटात एकत्र बघायला मिळणार आहेत. या चित्रपटाची शूटिंग कारगिल येथे होणार असून वरुण आणि आलिया शूटिंगसाठी रविवारी कारगीलला जाणार आहेत. ‘बॉलिवूड लाईफ’च्या रिपोर्टनुसार, माधुरी दीक्षित, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त त्यांना काही दिवसानंतर तिकडे जॉईन करणार आहेत.

‘कलंक’ हा चित्रपट करण जोहरचा मल्टी स्टार चित्रपट आहे. हा एक पीरियड ड्रामावर आधारित सिनेमा असून यात आलिया नव्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. ‘कलंक’ आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, माधुरी दीक्षित, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट एप्रिल २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

दीपिकाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी…!

तनुश्री दत्ताला नानांनी बजावली कायदेशीर नोटीस

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चॉकलेट फज

News Desk

Gandhi Jayanti : भाजपच्या पदयात्रा मोहिमेत मुख्यमंत्री सहभागी

swarit

राहुल गांधींच्या बायोपिकचा टिझर लॉंच

News Desk
क्राइम

वडिलांनीच केली मुलीची हत्या

swarit

सोलापूरतेलंगणामधील ऑनर किलिंगच्या घटनेने संपुर्ण देशाला हदरवून टाकले होते. या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये झाली आहे. शेतात काम करणाऱ्या सालगड्याच्या मुलासोबत लग्न केल्यामुळे ही हत्या करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. वडील आणि आई या दोघांनी आपल्या मुलीची हत्त्या केली. आरोपी वडील विठ्ठल धोंडिबा बिराजदार आणि आई श्रीदेवी बिराजदार यांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केले आहे.

अशी झाली अनुराधाची हत्या

अनुराधा ही कर्नाटकमध्ये वैद्यकीय( बी.ए.एम.एस.) शिक्षण घेत होती. तिने शेतात काम करणाऱ्या सालगड्याच्या मुलासोबत लग्न केले होते. अनुराधाच्या वडिलांना हे कळताच ते तिला कर्नाटकातून घरी घेऊन आले. आणि अनुराधाचे मामा बाळासाहेब म्हमाणे हे बोराळमध्ये राहत होते. अनुराधाला तिच्या वडिलांनी मामाच्या घरी सोडून आले. थोड्या दिवसांनी अनुराधाची तोंडी परीक्षा असल्याचे कारण सांगून तिला बोरालमधून ४ ऑक्टोबरला घरी घेऊन आले. अनुराधा ५ ऑक्टोबरला शेतात हत्या केल्यानंतर तिथेच तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

अनुराधाने मृत्यूपूर्वी दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या. त्यात चिठ्ठीत लिहले होत की, “माझ्या आई-वडिलांपासून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या जीवाचे बर-वाईट झाल्यास माझ्या आई वडिलांना जवाबदार ठरवा,” अनुराधाच्या मामाने या घटनेची तक्रार पोलिसांना केली. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

Related posts

अल्पवयीन मुलाचे अपहरण, पोलिसांनी अवघ्या 36 तासात शोधून काढले

News Desk

गळफास घेवून तरुण शेतक-याची आत्महत्या

News Desk

मलिकांच्या आरोपानंतर आता वादात अमृता फडणवीसांची उडी…

News Desk