HW News Marathi
मनोरंजन

“माझा समस्त भावांनो आणि भगिणींनो”, नवाजुद्दीनचे मराठीत ट्विट

मुंबई | “माझा समस्त भावांनो आणि भगिणींनो”, आजपासून डबिंगची सुरुवात केली आहे…!!! अशा कॅप्शनसह डबिंगचा फोटो अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी काल (४ ऑक्टोबर) ट्विटरवर शेअर केला आहे. गेल्या अनेक महिन्यापासून चर्चेत असलेल्या ठाकरे चित्रपटाच्या डबिंगला सुरुवात झाली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात नवाजुद्दीन बाळासाहेबांची भूमिका साकारणार आहे. परंतु हिंदी भाषिक व्यक्ती बाळासाहेबांची भूमिकेला न्याय देईल का? अशा शंका अनेकांच्या मनात येत होत्या. या शंकाचे निरसन करताना नवाजुद्दीन म्हणाला की, बाळासाहेबच मला मराठी बोलण्याची प्रेरणा व आशीर्वाद देतील, अशा शब्दात टीका करणाऱ्यांना उत्तर दिले.

नवाजुद्दीन मराठी ट्विट केल्याने कळते की, त्यांनी बाळासाहेबांची भूमिका साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. या सिनेमासाठी अगदी मराठी भाषा शिकण्यापासून तर त्याचे योग्य उच्चार शिकणे, बाळासाहेबांची देहबोली आत्मसात करण्यापर्यंतची तयारी नवाजुद्दीनने केली आहे. सोशल मीडियावर अनेर राजकीय नेते आणि अभिनेते नेहमीच ट्रोल होतात. परंतु नवाजुद्दींने मराठीत ट्विट केल्यानंतर त्यांना ट्रोल केले नाही तर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केले. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला होता. या सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षेते असून हा सिनेमा २३ जानेवारी २०१९ बाळासाहेबांच्या जयंती दिनी प्रदर्शित होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘सेक्रेड गेम्स २’ लाही ‘मीटू’चा फटका ?

News Desk

रजनीकांत यांच्या ‘पेटा’ सिनेमाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा

News Desk

कल्याण-डोंबिवलीत नायलॉन मांजावर बंदी ?

News Desk
महाराष्ट्र

राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास, लातूरवर पाणीटंचाईचे संकट

Gauri Tilekar

मुंबई | पुढच्या तीन-चार दिवसात मान्सून राज्यातून रजा घेणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झालेला आहे. सप्टेंबर महिन्यात देखील मुंबईसह राज्यात कुठेच समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून ऐन रब्बीच्या तोंडावर राज्यात रासायनिक खाते महागल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. रासायनिक खतांच्या गोण्या १०० ते २५० रुपयांनी महागल्या आहेत.

मांजरा धरणातील पाणीसाठा संपला, लातूर शहरावर पाणीटंचाईचे संकट

दोन वर्षांपूर्वी लातूर जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. जिल्ह्याची तहान भागविण्यासाठी विविध ठिकाणांहून रेल्वेने पाणी आणावे लागले होते. लातूर शहरावर आता पुन्हा एकदा भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातला पाणीसाठा संपला असून त्यामुळे शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

लातूर जिल्ह्यात यावर्षी आवश्यकतेपेक्षा कमी पाऊस पडल्याने अनेक ठिकाणचा पाणी साठा कमी झाला आहे. जिल्ह्यातील लहान मोठ्या धरणात सुद्धा अत्यल्प जलसाठा उरला असून, अनेक ठिकाणच्या विहिरींनी तळ गाठला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मांजरा धरणातल्या मृत पाणीसाठ्यावर लातूरकरांची तहान भागवली जात आहे. सध्या लातूर शहराला आठ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होत आहे. पाणी जपून वापरण्याचे आवाहन मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

Related posts

‘ही घ्या शिवसेनेच्या बाटग्यांची यादी!’, नितेश राणेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

News Desk

“मराठा समाजाला एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करु नका”, आशिष शेलारांचा सरकारला इशारा

News Desk

अमृता फडणवीसांना ‘मुंबई असुरक्षित वाटते ‘तर सुप्रिया सुळेंना ‘मुंबई पोलिसांमुळे मुंबई सुरक्षित’ वाटते !

News Desk