HW News Marathi
मनोरंजन

एजाज खानला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई | बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता एजाज खानला आज (२३ ऑक्टोबर)रोजी पोलिसांनी अटक केली आहे. एजाजला नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ड्रग्ज प्रकरणात बेलापूर सेक्टर ११ के. स्टार हॉटेलमध्ये त्याला बेड्या ठोकल्या आहेत. एजाजला बेलापूर न्यायालयात आज दुपारी हजर केले जाणार आहे.

एजाज खानने हॉटेलमध्ये ड्रग्ज घेतले असून काही मुलींना बोलावल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या मते ही एक रेव्ह पार्टी असल्याचे सांगितले आहे. एजाला अटक केल्यानंतर पोलिसांनी हॉटेलमधील त्याच्या रुममध्ये छापा टाकून झडती केली.

एजाज खानचा अल्प परिचय

एजाज खान हा बिग बॉसच्या सातव्या सीझनमध्ये त्यांनी चाहत्यांचे चांगले मनोरंजन केले होते. यानंतर एजाजने बॉलिवूडमध्ये प्रदार्पण केले. त्यांनी रक्त चरित्र, नायक आणि या रबा यासारखे बॉलिवूड सिनेमात काम केले आहे. तसेच एजाजने कॉमेडी नाईट विथ कपिल, करम अपना अपना आणि कहानी हमारे महाभारत की आणि रहे तेरा आशीर्वाद यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#HappyBirthdayLataDi | लतादीदी आयुष्यभर का राहिल्या अविवाहित ?

News Desk

बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk

दिग्दर्शक राजकुमार हिरानीवर लैंगिक शोषणाचा आरोप

News Desk
महाराष्ट्र

कर्जाला कंटाळून यवतमाळच्या शेतक-याची आत्महत्या

News Desk

यवतमाळ | महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. गेल्याच आठवड्यात एका शेतकऱ्याने आपल्या आत्महत्येला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचे चिठ्ठीत लिहून आत्महत्या केली होती. हे प्रकरण अजून सुरु असताना यवतमाळ जिल्ह्यातील आणखी एका शेतक-यांने शनिवारी आत्महत्या केली.

उमरखेड तालुक्यामधील सावळेश्वर येथील माधव शंकर रावते या ७१ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने शनिवारी शेतातील पऱ्हाटीची चिता पेटवून त्यात स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. शनिवारी घडलेली ही घटना सोमवारी उघडकीस आली.

सावळेश्वर हे गाव अत्यंत दुर्गम भागात असल्याने दोन दिवसांपूर्वी घडलेली ही घटना सोमवारी उघडकीस येताच शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली. माधव रावतेंकडे असलेल्या ४ एकर कोरवाहू शेतीत सततच्या नापिकीमुळे ते निराश होते. यावर्षी बोंडअळीमुळे त्यांना केवळ तीन क्विंटल कापूस झाला होता. त्यामुळे रावते आर्थिक संकटात होते. त्यांच्यावर स्टेट बँकेचे 60 हजारांचे कर्ज असल्याने गेल्या काही दिवसांपासून चिंतेत असलेल्या रावतेंनी शनिवारी आपली जीवन यात्रा संपवली.

 

Related posts

फडणवीसांच्या दिल्ली मेट्रो प्रवासावरुन कॉंग्रेस, राष्ट्रवादीची टोलेबाजी

News Desk

चिपळूण येथील मृत कोविड रुग्णांच्या नातेवाइकांना विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर

Aprna

आपले आमदार जाऊ नये या भीतीने कदाचित देवेंद्र फडणवीस बोलत असावे – रोहित पवार  

News Desk