HW News Marathi
मनोरंजन

‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाच्या ट्रेलरला हिरवा कंदील

नवी दिल्ली | ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादामुळे या चित्रपटाच्या ट्रेलरवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका आज (९ जानेवारी) दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि न्या. व्ही.के. राव यांच्या खंडपीठाने या याचिकेवर आपला निर्णय सुनावला आहे.

‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे देशाच्या पंतप्रधानपदाची प्रतिमा मलिन होत असून देशाच्या पंतप्रधानपदाची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनामी होत असल्याचे या याचिकेत म्हणण्यात आले होते. मात्र, यात वैयक्तिक हिताचाही समावेश असल्याचे म्हणत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे

‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय जीवनावर आधारित चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचनंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. या चित्रपटावरून भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरु झाली. त्यामुळे या चित्रपटाच्या ट्रेलरवर बंदी घालण्याची मागणी होत होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Metooला ए. आर. रहमान यांचा पाठिंबा

Gauri Tilekar

महाराष्ट्राची महती सांगणारे “माझा महाराष्ट्र” गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

News Desk

दिलवाले दुल्हनिया ले जाएगेंच्या प्रदर्शनात 22 वर्षानंतर खंड

News Desk
राजकारण

आधी माझ्या शेतकऱ्यांचे काय करता ते बोला !

News Desk

बीड | आगामी लोकसभा निवडणुकीत युतीची चर्चा करण्याआधी माझ्या शेतकऱ्यांचे काय करता ते बोला, तुमचे दिवस आता कमी राहिलेत तरी किती? असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे आज (९ जानेवारी) यांनी बीडमध्ये घेतलेल्या सभेत ते बोलत होते. ठाकरे हे एक दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यावर यावेळी ते बोलत होते.

ठाकरे आजपासून बीड आणि जालन्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शिवसेनेकडून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पशुखाद्य आणि पाणी टँकर वाटप करण्यात आले. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमाफीचीही चौकशी करणार आहेत.

बीडच्या जाहीर सभेत नेमके काय बोले

या सभेत ठाकरेंनी कर्जमाफी, शेतकरी, राम मंदिर, राफेल आदी मुद्यांवरून मोदींवर टीका केली आहे. “मी पुन्हा मराठवाड्यात येणार आहे, ही माझी शेवटची भेट नाही. ‘संधीसाधू येती घरा, समजा निवडणुका आल्या’ राफेल सारखाच पिक विमा योजना सुध्दा घोटाळा आहे. घोषणांमुळे जनतेचं पोट भरणार नाही. खोटे बोलून अन्नदात्‍याची फसवणूक करून नका. ना तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकला ना तुम्ही राम मंदिराचा मुद्दा सोडवू शकला, आम्ही मन की नाही तर जनची बातमी करतो. केंद्रीय पथक येऊन गेले, तुमच्या हातात काही मदत पडली का ? “असा सवाल ठाकरे यांनी जनतेला केला.

 

 

Related posts

१०० दिवसांत मोदी सरकारपासून देशातील जनता मुक्त होईल !

News Desk

महिला आयोगाने चित्रा वाघ यांना खडसावले; दोन दिवसात उत्तर द्या नाही तर…

Aprna

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १४ ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारणार; जिल्हाधिकारी निधी चौधरींची माहिती

Aprna