HW News Marathi
मनोरंजन

गुलमोहर फुलला

रणरणत्या उन्हात आपले सौंदर्य टिकवून ठेवणारा वृक्ष म्हणून आपण गुलमोहर या वृक्षाकडे पाहू शकतो. गुलमोहरचे शास्त्रीय नाव ‘डिलॉनिक्स रेजिया असे आहे. तर इंग्लिशमध्ये ‘मे फ्लॉवर ट्री’अशा नावाने गुलमोहरला संबोधले जाते. हा वृक्ष अनेक वेगवेगळ्या देशात आढळून येतो. कडक उन्हात फुलणारा गुलमोहर आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे अनेकांना आकर्षित करतो. या झाडाची उंची ५० ते ६० फुटापर्यंत वाढते. गुलमोहराला तीन ते चार वर्षात बहर येतो तो बहरला की एका छत्री सारखा दिसतो.

गुलमोहराला उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल ते मे महिन्यात सुंदर लाल रंगाची फुले येतात. फुले येण्याआधी याची सर्व पाने गळून पडतात. उन्हाळ्यात या झाडाकडे पाहिले की मन प्रसन्न होते.गुलमोहरच्या फुलांना पाच लाल-केशरी पाकळ्या असतात त्या पाकळ्यांवर पांढऱ्या-पिवळ्या रंगाच्या आकर्षक रेष्या असतात. या रेषा गुलमोहराचे सौंद्रय अधिकच खुलवतात.

भारतातले उष्ण वातावरण गुलमोहर या झाडासाठी पोषक नाही. या झाडाची इतर झाडांप्रमाणे वाढ होते. या झाडाची मुळे जमिनीत फार खोलवर जात नाहीत तर ती वरच्यावर पसरतात आणि झाड वाढताच त्याची मुळे जमीतून मान वर काढतात. गुलमोहरचे झाड बाहेरुन मजबूत दिसते परंतु, ते आतून पोकळ असते. त्याच्या फांद्या इतर झाडांच्या तुलनेत कमकुवत असतात.ढिसूळ असलेल्या या झाडाची वेळोवेळी छाटणी होणे गरजेचे असते. वादळ-वा-यात गुलमोहर सहज उन्मळून पडते.

मुंबई शहरात अनेक ठिकाणी गुलमोहराची उंच उंच आकर्षक अशी झाडे पहायला मिळतात. पण गेल्या पाच वर्षात महापालिकेने मुंबईत गुलमोहराची झाड लावली नाहीत. वाढती लोकसंख्या वाहनांची वर्दळ उंचउंच इमारती अरुंद झालेले रस्ते हे सर्व लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने गुलमोहरची झाडे लावणे बंद केले असल्याचे मुंबई महापालिकेच्या अधिका-या गुलमोहर झाड पडल्याने झालेल्या दुर्घटनेसंदर्भात माहीती देताना सांगितले. सध्या मुंबईत गुलमोहर ऐवजी भारतीय जातीच्या तामण, कांचन, भावा, आमल, तास, फेलम ट्री आणि अशोक या झाडांची लागवड पालिकेकडून केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

डॉ. अरुणा ढेरे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

swarit

दिलवाले दुल्हनिया ले जाएगेंच्या प्रदर्शनात 22 वर्षानंतर खंड

News Desk

भारतीय निर्मितीच्या ‘पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स’ लघुपटाला ऑस्कर

News Desk
महाराष्ट्र

औरंगाबादच्या कचराकोंडीला राज्यसरकारही जबाबदार | उद्धव ठाकरे  

News Desk

औरंगाबाद |कच-याच्या ढिगा-यात गेल्या दोन महिन्यांपासून दिवस ढकलत असलेल्या औरंगाबाद करांची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली. उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौ-यावर आहेत. गुरुवारी त्यांनी औरंगाबादला भेट दिली यावेळी आवर्जून उद्धव यांनी सामान्यांना त्रासदायक ठरत असलेल्या औरंगाबादच्या कचरा प्रश्नाला हात घातला.

या कच-याची विल्हेवाट करण्याची जबाबदारी नक्की कुणाची आहे या वादात मी पडणार नाही असे म्हणत आपण या प्रकरणात दिलगिरी व्यक्त करत असल्याचे ठाकरे म्हणाले.

गुरुवारी त्यांनी औरंगाबादेतील कंचराकोंडीवर दिलगिरी व्यक्त केली. मात्र या कचराकोंडीला एकटी शिवसेना नव्हे तर राज्य सरकारही जबाबदार असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपलाही टोला लगावला. दरम्यान, औरंगाबादचा कचरा प्रश्न मार्ग लागला नसल्यामुळे शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.

Related posts

लोकांना विकासकामं पाहिजेत फक्त शब्द नको, विजयानंतर रोहीत पवारांचा राम शिंदेंना टोला

News Desk

कोरोनामुक्त भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार, ठाकरे सरकारकडून शासन निर्णय जारी

News Desk

वादग्रस्त बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांची बदली!

Aprna