HW News Marathi
मनोरंजन

नागराज मंजुळे आता मुख्य भूमिकेत दिसणार

मुंबई | प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ या लोकप्रिय चित्रपटांनंतर आता नागराज पुन्हा एकदा प्रेक्षकांना वेड लावायला येणार आहेत. काही दिवसांपूर्वी ‘नाळ’ असे शीर्षक असणाऱ्या या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टिझरमध्ये ‘आई मला खेळायला जायचेय’ या गाण्यातून आईकडे खेळायला जाण्याचा हट्ट करणाऱ्या अशा एका निरागस मुलाची कथा दिसत आहे. या टिझरनंतर आता चित्रपटाचे पाहिले गाणे देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या टिझरमध्ये असलेल्या निरागस मुलाच्या वडिलांची भूमिका खुद्द नागराज यांनी सरकारी आहे.

‘नाळ’ या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे यांनी निर्मिती क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आहे. या चित्रपटाची निर्मिती नागराज मंजुळे यांनी तर दिग्दर्शन ‘सैराट’चे कॅमेरामॅन सुधाकर रेड्डी यांनी केले आहे. तसेच हा चित्रपट १६ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. ‘नाळ’ या चित्रपटानंतर नागराज मंजुळे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ‘नाळ’ या सिनेमाच्या टीजरला फार कमी वेळातच २ मिलियन पेक्षा जास्त व्हियूज मिळाले आहेत
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार लीलावती रुग्णालयात दाखल

News Desk

लालबागच्या राजाच्या चरणी सोन्याची गणेश मुर्ती अर्पण

swarit

बीग बीसोबत नागराजचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

News Desk
मुंबई

रिलायन्स कंपनीची निवड कुणी केली, हे ड सॉल्ट एव्हीएशनलाच माहिती !

Gauri Tilekar

मुंबई| राफेल डीलप्रकरणी गैरव्याहारांचे आरोप संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळले आहे. सीतारामन असे देखील म्हटल्या की, “रिलायन्स कंपनीची निवड कुणी आणि का केली हे डसॉल्ट एव्हीएशनलाच,” माहिती असेल असे सांगून हात झटकले आहेत. सीतारामन या आज (२५ ऑक्टोबर) ला मुंबईतील इंडिया समिटमध्ये त्यांनी आपले मत मांडले.

राफेल डीलवरून सतत काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला हे उत्तर दिले आहे. यावेळी त्या असे देखील म्हटणाल्या की, राफेल डील करारातील हा निकष २०१२ मधील मूळ निविदेमध्ये सुद्धा होता. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार हे स्पष्ट केले होते. राफेल डील पुर्णपणे काँग्रेस सरकारच्या काळात ठरविलेल्या करारानुसारच झाली होती.

काँग्रेसने त्यावेळी सरकारने १८ विमाने थेट खरेदी करण्याचे ठरवले होते. मोदी सरकार या डीलमध्ये विमानांच्या संख्ये वाढ करून ३६ केली आहे. सध्या दोन तुकड्यांची तात्काळ निकड असल्याने ३६ विमाने खरेदी केली जात आहेत, असेही सीतारामन यांनी म्हटले.

 

Related posts

अनुपम खेर एफटीआयच्या प्रमुखपदी

News Desk

Raj Thackeray ED : मरिन ड्राईव्ह, दादर, आझाद मैदानासह ईडी कार्यालयाबाहेर जमाव बंदी

News Desk

बेस्ट कर्मचाऱ्यांचा लढा यशस्वी, कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार किमान ७००० रुपयांची वाढ

News Desk