HW News Marathi
मनोरंजन

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील `हे मृत्युंजय’ नाटकाचा मुहूर्त

मुंबई | स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि अनामिक यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित हे मृत्युंजय हे नाटक साईसाक्षी प्रकाशित करत आहे. त्याचा मुहूर्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मादाम कामा सभागृहात शानदार वातावरणात झाला. यावेळी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्षा मंजिरी मराठे, पदाधिकारी दुर्गेश परुळेकर, दिनू पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे तर नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले आहे. देवदत्त बाजी यांचे पार्श्वसंगीत असून प्रकाशयोजना शीतल तळपदे यांनी सांभाळली आहे. अजिंक्य ननावरे, संदीप सोमण, जयेंद्र मोरे, सुयश पुरोहित, शार्दुल आपटे, बिपीन सुर्वे, नितीन वाघ, विशाख म्हामणकर, केतन पाडळकर, योगेश दळवी, मधुसूदन सोनावणे हे यातील कलाकार आहेत. या नाटकातील परिच्छेदांच्या अभिवाचनाचा देखील कार्यक्रम यावेळी झाला. लवकरच हे नाटक रंगभूमीवर सादर होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वीरमाता जिजाबाई भोसले यांच्या जयंतीनिमित्त पालिकेतर्फे जिजाऊच्या पुर्णाकृती शिल्पास पुष्पहार अर्पण

News Desk

मलिष्काला स्वयंसेवी संघटनांचा पाठिंबा

News Desk

‘हाऊसफुल-4’च्या सेटवर महिला ज्युनिअर आर्टिस्टचा विनयभंग

News Desk
महाराष्ट्र

Bhima Koregaon | आरोपीची चौकशी कुणी करायची ते आरोपी ठरवू शकत नाही

News Desk

नवी दिल्ली | ‘नक्षली कनेक्शन’च्या संशयावरून अटक करणाऱ्यात अलेल्या पाचही विचारवंतांनी पुणे पोलिसांनी आपल्या विरोधात केलेली कारवाई ही राजकीय हेतूने केल्याचे म्हटले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमावे, अशी मागणी देखील केली आहे. सदर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी दरम्यान आरोपींची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

कुणीही आरोपी आपली चौकशी कुणी करायची, हे ठरवू शकत नाहीत, असे स्पष्ट शब्दात सुनावले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए एम खानविलकर यांनी वरवरा राव, अरुण फरेरा, वर्नान गोन्साल्विस, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा यांना चपराक लगावली. एसआयटी स्थापन करण्यास स्पष्ट नकार देत सर्वोच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना तपास पुढे नेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Related posts

शेतकऱ्यांप्रमाणेच आम्हाला देखील आत्महत्या करावी लागेल

News Desk

BMC मधील प्रभाग रचनेतील बदललेल्या नकाशाबाबत भाजप नेत्याचा आक्षेप

Aprna

घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणारे ‘ग्रामविकास’चे महाआवास अभियान

News Desk