HW News Marathi
मनोरंजन

लालबागच्या राजाच्या चरणी सोन्याची गणेश मुर्ती अर्पण

मुंबई | लालबागाचा राजाच्या चरणी दरवर्षी भाविक मोठ्या प्रमाणात दान देतात. यंदाही एका भाविकांनी लालबागचा राजाची १ किलो २७१ ग्रॅमची सोन्याची प्रतिकृती अर्पण केली आहे. ही मुर्ती अतिशय आकर्षक अशी असून या मुर्तीच्या मुकुटात हिरे जडले आहे. ही सोन्याची मूर्ती भरीव असून तिची किंमत जवळपास ४२ लाख रुपये इतकी आहे. गेल्या पाच दिवसांपासून लालबागच्या राज्याच्या चरणी दोन कोटी ६४ लाख रुपयांचे दान जमा झाले आहे.

गतवर्षी एका भाविकाने ३१.५ लाखाची सोन्याची गणेश मुर्ती लालबागचा राजाला अर्पण केली होती. यात सोने आणि चांदीच्या मुर्तींसह दागिन्यांचा समावेश होता. लालबागाच्या राजाच्या चरणी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शन घेतले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ला मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाईम शो नाही

swarit

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

News Desk

‘आर्ट एक्सपो’च्या प्रदर्शनात हातमागाचे वैविध्य पाहून ‘श्रेया बुगडे’ झाली दंग

News Desk
राजकारण

पक्षांच्या रात्रीच्या प्रचारामुळे लोकांना त्रास, निवडणूक आयोगाने घातली बंदी

News Desk

नवी दिल्ली | निवडणुकीच्या आचारसंहितेनुसार सर्व राजकीय पक्षांचा प्रचार रात्री १० वाजल्यानंतर थांबविण्यात येतो. परंतु त्यानंतर इतर अनेक पद्धतीने उमेदवारांचे प्रचारकार्य सुरूच असते. उमेदवार दिवसातील थोडाही वेळ ते वाया घालवीत नाहीत असेच चित्र पाहायला मिळते. त्यामुळे हा त्रास थांबविण्यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या या रात्रीच्या प्रचारकार्यावर बंदी घातली आहे.

रात्रीच्या वेळेत फोन, एसएमएस, व्हॉट्सऍपद्वारे उमेदवारांचा हा प्रचार सुरूच राहत असल्याने लोकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी ही बंदी निडणूक आयोगाचे सचिव एन. टी. भुतिया यांच्याकडून राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशांचे काटेकोर पद्धतीने पालन करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.

लोकांना तक्रार नोंदविण्यासाठी ‘सी व्हिजिल ऍप’

मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी ‘सी व्हिजिल ऍप’ सुरु केले आहे. आचारसंहितेच्या काळात रात्री १० वाजल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाने वा उमेदवाराने प्रचारासाठी फोन किंवा एसएमएस केला तर त्याची तक्रार करण्यासाठी ‘सी व्हिजिल ऍप’ सुरु करण्यात आला आहे.

Related posts

यंदा दिवाळी काढणार दिवाळ

swarit

अहमदनगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष करण ससाणे यांचा राजीनामा

News Desk

मला कमळासमोरचे बटण दाबायचे होते पण…!

News Desk