HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

ओवैसींच्या सुचनेप्रमाणे वंचितशी आघाडी तोडण्याचा निर्णय | इम्तियाज जलील

औरंगाबाद | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघ यांच्या वंचित बहुजन आघाडीत आता जागावाटपावरून बिघाड झाल्यामुळे एमआयएम बाहेर पडणार असून निवडणूक ही स्वबळावर लढणार असल्याचे एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केले आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनीच्या सुचनेप्रमाणे वंचितशी आघाडी तोडण्याचा निर्णय घेतल्याचे जलील यांनी सांगितले.

निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेकर यांनी एमआयएमला ८ हुनपेक्षा अधिक जागा देण्यास तयार नसल्याने आम्ही आघाडीतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतल्याचे जलील यांनी सांगितले. जलील यांनी ओवैसी यांच्याशी चर्चा न करता परस्पर निर्णय घेतल्याचाही आरोप आघाडीतर्फे करण्यात येत आहे.दरम्यान हे सर्व आरोप जलील यांनी यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावत म्हटले की, “मी पक्षाचा लहान कार्यकर्ता असलो तरी मी पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. त्यामुळे मला निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत. माझ्या वरिष्ठांनी सांगितल्यानंतर युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का देत वंचित बहुजन आघाडीने मोठ्या प्रमाणात मते आपल्याकडे वळविली होती. विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएमने वंचित बहुजन आघाडीला सुरुवातीला १०० जागांची मागणी केली होती. त्यानंतर ही मागणी ७५ वर आली. त्यानंतर अगदी ५० वरही एमआयएम तयार झाली. मात्र आंबेडकरांनी या सगळ्याच मागण्या फेटाळल्या आहेत. यानंतर वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसची पहिली यादी आज होणार जाहीर, विद्यमान आमदारांना पुन्हा मिळणार संधी

News Desk

Narendra Patil Vs NCP | ‘मिसळीचा ठसका’ राष्ट्रवादीला लागला ..

News Desk

अमित शहांच्या उपस्थितीत मातब्बर नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk