HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

जाड भरडे पीठ पण दूसऱ्या पक्षात गेले, आत्ता जमिनच नांगरायची वेळ आलेय !

पुणे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पावर यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना डबल ढोलची उपमा देणारी फेसबुक पोस्ट लिहिन पक्षांतर करणाऱ्यावर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी पुढे असे देखील म्हटले की, “जाड भरडे पीठ पण दूसऱ्या पक्षात गेले. आत्ता जमिनच नांगरायची वेळ आलेय. चांगली मशागत करुन ठेवुया,” असे म्हणत सर्व कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे संकेत दिले आहे.

रोहित पवार म्हटले की, “गरज पडली की साहेबांचा सल्ला, गरज पडली की बारामतीत येवून साहेबांच कौतुक करायचे आणि निवडणुकीची वेळ आली की त्यांनीच विचारायचं साहेबांनी काय केले?, डबल ढोल असतो. जो दोन्हीकडून वाजतो. समोरच्या पक्षाचं राजकारण नेहमीच डबल ढोल असल्यासारखं वाजत असत. पण आत्ता बास झाले. साहेबांच राजकारण म्हणजे कुणीही उठावे आणि बोट दाखवाव अस निश्चितच नाही.” अशी टीका रोहित यांनी केली आहे.

 

रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये नेमके काय म्हटले

गरज पडली की साहेबांचा सल्ला, गरज पडली की बारामतीत येवून साहेबांच कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की त्यांनीच विचारायचं साहेबांनी काय केलं? डबल ढोल असतो. जो दोन्हीकडून वाजतो. समोरच्या पक्षाचं राजकारण नेहमीच डबल ढोल असल्यासारखं वाजत असत.

पण आत्ता बास झालं.

साहेबांच राजकारण म्हणजे कुणीही उठावं आणि बोट दाखवाव अस निश्चितच नाही. गेल्या ५० वर्षात तीन पिढ्यांनी पाहिलेलं हे राजकारण आहे. साहेबांमुळे ज्याने शेतीतून चार पैसै कमावले त्यांच्या मुलाने तालुक्याच्या ठिकाणी चांगले शिक्षण घेवून नोकरी केली आणि त्याचा नातू आज IT कंपनीत नोकरी करु शकतो. शेती पासून ते IT पार्क उभा करण्यापर्यन्तची हि शृंखला आहे.

महिलांना समान संधी निर्माण करण्यापासून ते उपेक्षित व दिनदुबळ्या लोकांच्या पाठीमागे उभा राहण्याचा हा प्रवास आहे. प्रसंगी राजकारणाची तडजोड न करता साहेबांनी वंचित व अल्पसंख्याक समाजासाठी घेतलेले निर्णय उभा महाराष्ट्र जाणतो. जातीपाती, धर्माधर्मात भांडण लावणारा नाही तर माणसं जोडणारा हा इतिहास आहे.

सामान्य माणूस साहेबांच्या सोबत आहे तर घरात आमदारकी पासून खासदारकी आलेले नेतेमंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. मध्यंतरी पिठ बदलण्याची भाषा आपण केली होती, जाड भरडं पीठ पण दूसऱ्या पक्षात गेलं. आत्ता जमिनच नांगरायची वेळ आलेय. चांगली मशागत करुन ठेवुया.

लवकरच ठरवुया…

कधी कुठे आणि कशी सुरवात करायची.

पण एक लक्षात असू द्या. महाराष्ट्राच्या मातीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी रुजवेलेली विचारांची व विकासांच्या राजकारणाची श्रृखंला थोरामोठ्यांच्या आशिर्वांदाने आपणा तरुणांनाच पुढे घेवून जावी लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उदयनराजे भोसलेंना धक्का, सातारा लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात

News Desk

ओवैसींच्या सुचनेप्रमाणे वंचितशी आघाडी तोडण्याचा निर्णय | इम्तियाज जलील

News Desk